Monday, September 3, 2012

‘एमपीएससी’चा राजमार्ग:मुख्य परीक्षा:सर्वागीण, नेमका व नियोजित अभ्यास हाच एमपीएससीचा राजमार्ग!

‘एमपीएससी’चा राजमार्ग:मुख्य परीक्षा:सर्वागीण, नेमका व नियोजित अभ्यास हाच एमपीएससीचा राजमार्ग!

तुकाराम जाधव, शनिवार, ९ जून २०१२
संचालक, द युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.
malharpatil@gmail.com 
विद्यार्थी मित्रहो, १ मार्च २०१२ पासून म्हणजे गेल्या सुमारे ३ महिन्यांपासून आपण एमपीएससी परीक्षेविषयी विविधांगी चर्चा करत आहोत. प्रस्तुत लेख हा या मालिकेतील शेवटचा म्हणजे समारोपाचा लेख होय. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम व परीक्षापद्धती बदलल्याचे जाहीर करताच दै. लोकसत्ताने या बदलाविषयी सर्वागीण माहिती देण्यासाठी या लेखमालेचे आयोजन करण्याचा तत्काळ निर्णय घेतला. त्यामुळेच या लेखमालेद्वारा राज्यसेवा परीक्षेचा नवा अभ्यासक्रम, परीक्षापद्धती आणि अभ्यासाचे धोरण याविषयी सविस्तरपणे जाणून घेणे संभव झाले. ‘द युनिक अ‍ॅकॅडमी’तील विविध जाणकार प्राध्यापकांनी आपल्या अनुभवाच्या आधारे राज्यसेवा पूर्व, मुख्य परीक्षा आणि मुलाखत या तिन्ही टप्प्यांविषयी पायाभूत मात्र सर्वागीण चर्चा करण्याचा प्रयत्न केला. आज या लेखमालेचा समारोप करताना एकंदर राज्यसेवा परीक्षेच्या तयारीची रणनीती सारांशरूपाने अधोरेखित करणे महत्त्वपूर्ण ठरते.
पूर्वी म्हटल्याप्रमाणे एमपीएससी ही एक स्पर्धात्मक परीक्षा असल्याने ‘आपण स्वत:ला कसे सिद्ध करतो आणि इतरांच्या तुलनेत कसे सरस ठरतो’, यावरच आपले यश अवलंबून आहे. त्यादृष्टीने विचार केल्यास राज्यसेवा परीक्षेचे स्वरूप, म्हणजे त्यातील पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत या टप्प्यांचे स्वरूप बारकाईने लक्षात घेणे अत्यावश्यक आहे. अर्थात गेल्या तीन महिन्यात या बाबी अत्यंत बारकाईने लक्षात घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर प्रत्येक टप्प्यासाठी निर्धारित केलेला अभ्यासक्रम आणि त्यासाठी वाचावयाचे संदर्भसाहित्यही लक्षात घेतले. प्रस्तुत बाबी लक्षात घेतल्यानंतर प्रश्न निर्माण होतो, ‘आता अभ्यास किती व कसा करायचा?’ या प्रश्नाचे उत्तर ज्या विद्यार्थ्यांला लवकरात लवकर समजते-उमजते तो विद्यार्थीच या परीक्षेत इतरांच्या तुलनेत सरस ठरतो. मागे अधोरेखित केल्याप्रमाणे राज्यसेवा परीक्षेच्या प्रत्येक टप्प्याचा अभ्यास करण्यापूर्वी योग्य नियोजनाची आखणी करणे ही प्राथमिक बाब ठरते. त्यासाठी प्रस्तुत टप्प्याचा अभ्यासक्रम, त्यासाठी वाचायची पुस्तके, त्या-त्या अभ्यास घटकातील आपली गती आणि त्या विषयाला परीक्षेत असणारे गुणांच्या भाषेतील महत्त्व या घटकांच्या आधारे वेळ व अभ्यासाचे नियोजन करावे. अर्थात हा अभ्यास सर्वागीण म्हणजे त्यातील संकल्पना, सिद्धांत, आकडेवारी, त्यातील कल आणि एकंदर विषयासंबंधी घडणाऱ्या चालू घडामोडी या बाबींना लक्षात घेऊन करावा. अभ्यास करत असतांनाच त्या-त्या घटकावर आतापर्यंत आलेले प्रश्न आणि संभाव्य प्रश्न याचा सतत विचार करावा. थोडक्यात, आपण जे काही वाचत आहोत त्यावर कशाप्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात, त्याचे नेमके उत्तर कोणते याचा सतत विचार करणे अत्यावश्यक ठरते. त्यामुळेच आपल्या तयारीत परीक्षाभिमुखतेची हमी देता येते. त्यासाठी अधिकाधिक सराव प्रश्नपत्रिका सोडवण्यावर भर द्यावा आणि त्याद्वारे स्वत:चे मूल्यमापन करावे. आपल्या मूल्यमापनातून जे कच्चे दुवे लक्षात येतील त्यावर मात करण्याचा प्रयत्न करावा. या संदर्भात सतत लक्षात ठेवायची बाब म्हणजे अभ्यासातील सातत्य होय. कारण राज्यसेवेची प्रभावी तयारी करण्यासाठी किमान एक वर्ष नियमित १०-११ तासांची गरज आहे यात शंका नाही. त्यामुळे अभ्यासक्रमातील प्रत्येक घटकाला योग्य वेळ देऊन त्याचा अभ्यासक्रम पूर्ण करणे शक्य बनते. यासाठी अभ्यासातील सातत्य व नियमितता या बाबींना पर्याय नाही. अन्यथा, एखाद्या घटकाला वेळ अपुरा पडण्याचीच शक्यता आहे. म्हणूनच कधी जास्त, कधी कमी असे न करता अत्यंत नियोजनबद्धपणे नियमित अभ्यास करण्यावर भर द्यावा.
आजपर्यंत लेखमालेतील विविध लेखांद्वारे आपण राज्यसेवेच्या प्रत्येक टप्प्यातील अभ्यासपद्धतीविषयी सांगोपांग चर्चा केली आहे. त्यातही नवा अभ्यासक्रम आणि नव्या परीक्षापद्धतीला लक्षात घेऊन कशाप्रकारे अभ्यास करायचा? त्याचे नियोजन कसे असावे, या महत्त्वपूर्ण घटकांची चर्चा केली आहे. आता गरज आहे ती प्रस्तुत लेखमालेतील प्रत्येक सूचना आणि मार्गदर्शनाची अंमलबजावणी करण्याची. अर्थात आपण सर्वानीच अभ्यासाची सुरुवात केली असणार यात शंका नाही. महत्त्वाचे म्हणजे तुम्ही सर्व जण उद्याची राज्यसेवा पूर्व परीक्षा देण्यास सज्ज असणार. तेव्हा तुम्हा सर्वाना उद्याची पूर्वपरीक्षा आणि त्यानंतरच्या नव्या राज्यसेवा मुख्यपरीक्षेच्या तयारीसाठी शुभेच्छा!

‘एमपीएससी’चा राजमार्ग: मुख्य परीक्षा: मुलाखतीस सामोरे जाताना..

‘एमपीएससी’चा राजमार्ग: मुख्य परीक्षा: मुलाखतीस सामोरे जाताना..

तुकाराम जाधव, शुक्रवार, ८ जून २०१२
संचालक, द युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.
malharpatil@gmail.com 
मुलाखतीची संकल्पना आणि मुलाखतीची तयारी करताना विचारात घ्याव्या लागणाऱ्या बाबी पाहिल्यानंतर प्रत्यक्ष मुलाखतीस कशाप्रकारे सामोरे जावे, याबाबतची चर्चा आजच्या लेखामध्ये करू या. 
साधारणपणे उमेदवाराने पुढील बाबी विचारात घेऊन मुलाखतीस प्रत्यक्षपणे सामोरे जाणे अधिक लाभदायक ठरेल. 
(१) पहिली गोष्ट म्हणजे तुमचा पोशाख. कारण त्यावरून तुमची आवड-निवड, आचार-विचार समजत असतात. तेव्हा पोशाख हा साधा मात्र नीटनेटका असावा, स्वच्छ, इस्त्री केलेला व स्वतस शोभून दिसणारा असावा. मुलांनी शक्यतो शर्ट-पँट व टाय तर मुलींनी सलवार-कमीज अथवा साडी घालावी. आपण कोणत्याही समारंभास जात नाही याचे भान ठेवून सौंदर्यप्रसाधनांचा कमीत कमी वापर करावा.
(२) दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे कोणतीही धावपळ होऊ नये म्हणून नियोजित वेळेआधी नियोजित जागेवर पोहोचणे. मुलाखतपत्रात वेळ दिलेली असते तेव्हा तत्पूर्वी तुम्ही तेथे हजर राहा.
(३) जेव्हा तुम्ही मुलाखत कक्षात पोहोचाल, तेव्हा कितीही काळजी, चिंता वाटत असली, तरी आपल्या भावनांवर ताबा ठेवा, शांत राहण्याचा प्रयत्न करा व सर्वाना अभिवादन करा. जेव्हा तुम्हाला बसण्यास सूचित करण्यात येईल तेव्हा बसा. कारण तुमची मुलाखत काही उभी राहून घेतली जाणार नाही, तेव्हा शांत राहा.
(४) तुम्ही शांत राहण्यासोबतच आत्मविश्वासानेही बोलले पाहिजे. मुलाखत मंडळ तुम्हाला काही बाहेर काढण्यासाठी नव्हे तर तुमची निवड करण्यासाठी तेथे बसलेले असते. जर तुम्ही आत्मविश्वासाने उत्तरे देत असाल तर त्याचा नक्कीच अनुकूल प्रभाव पडत असतो.
(५) तुमच्या आत्मविश्वासाबरोबर नम्रपणाही दिसून येणे महत्त्वाचे आहे. जेव्हा तुम्ही नजरेत नजर घालून उत्तरे द्याल, तेव्हा तुमचा आत्मविश्वास दिसून येईल. त्याचप्रमाणे तुमच्या उत्तर देण्याच्या पद्धतीवरून देखील तुमचा नम्रपणा जोखता येतो.
(६) मुलाखत मंडळाच्या सदस्यांचा आदर राखा. त्यांच्या अनुभवाचा मान राखा व उलट उत्तरे देऊ नका. अथवा उलट प्रश्न विचारू नका, शिवाय संलग्न अथवा अतिशयोक्त उत्तरे देऊ नका. जर माहिती नसेल, तर तसे स्पष्ट सांगा, मात्र चुकीची माहिती देऊ नका. अन्यथा त्याचा नकारात्मक परिणाम संपूर्ण मुलाखती दरम्यान दिसून येऊ शकतो.
(७) तुमच्या उत्तरासोबत तुमचा आवाजही तितकाच महत्त्वाचा असतो. आवाजात चढ-उतार अथवा चिरकेपणा नसावा. शक्यतो एकाच आवाजात बोला. जास्त चढा आवाज अथवा जास्त मिळमिळीत आवाज योग्य ठरणार नाही.
प्रत्यक्ष मुलाखती दरम्यान .. 
मुलाखतीसाठी उमेदवाराने आपले व्यक्तिमत्त्व परिचयपत्र (Bio-Data) सात प्रतीत सादर करावे लागते. मुलाखतीदरम्यान मुलाखतकर्त्यांजवळ या प्रती असतात. त्याआधारे मुलाखतीचा प्रारंभ Bio-data मधील आपल्या वैयक्तिक माहितीवर आधारित प्रश्नांनी होतो. साधारणत: अध्यक्ष आपणास आपले नाव, गाव व भौगोलिक माहिती विचारून मुलाखतीदरम्यानचा उमेदवारावरील ताण दूर करण्याचा प्रयत्न करतात. कोणी कितीही तयारी केली वा सहजपणे मुलाखतीला सामोरे जायचे म्हटले, तरी जीवनाच्या ध्येयानिकट पोचल्यानंतर अपयशाच्या भीतीने नकळत ताण जाणवतो. परंतु अध्यक्षांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देता आली या विश्वासातून हा तणाव निवळण्यास सुरुवात होते व नंतर चालू होते ती केवळ चर्चा ! ही चर्चा जेव्हा मनमोकळ्या वातावरणात पार पडल्याचे समाधान उमेदवार व मुलाखतकत्रे दोहोंना मिळते, तेव्हा निश्चितच आपण आपल्या ध्येयाजवळ पोचल्याचे संकेत प्राप्त होतात. अर्थात त्यासाठी मुलाखतीचा कालावधी हा गौण मुद्दा ठरतो. मुलाखत जास्त वेळ चालली म्हणजे सकारात्मक बाब किंवा थोडा वेळ चालली म्हणजे नकारात्मक सूर बाळगणे चुकीचे ठरते. दुर्दैवाने आणखी एक गरसमज उमेदवारांमध्ये दिसतो तो म्हणजे, प्रत्येक प्रश्नाचे उत्तर येणे आवश्यक आहे. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळावे अशी अपेक्षा मुलाखतकर्त्यांत नसते. यानुसार प्रश्नाचे उत्तर माहीत नाही, यातून उमेदवाराचा प्रामाणिक स्वभाव समजतो, आपले अज्ञान लपविण्यासाठी वेळ मारून नेणाऱ्या वृत्तीचा अभाव माहीत होतो. सलग काही प्रश्नांची उत्तरे देता न आली तरी त्याचा विशेष फरक पडत नाही, हे मला स्वत: माझ्या मुलाखतीतून अनुभवता आले.       
मुलाखतीदरम्यान आपल्या हजरजबाबीपणाची चुणूक मुलाखतमंडळाला दाखवावी. यासाठी वातावरण खेळकर असावे, एखाद्या प्रश्नावर स्वतंत्र विचार करून उत्तर देण्याचे चातुर्य हवे. अर्थात हे सारे नेमक्या व प्रभावी शब्दांत व्यक्त व्हावे. आपले उत्तर कायद्याच्या वा नियमांच्या चौकटीत असावे. आपल्या उत्तराने कोणतेही आक्षेपार्ह वा प्रक्षोभित वातावरण निर्माण होऊ न देण्याची काळजी घ्यावी.
मुलाखत म्हणजे हत्ती गेला नि शेपूट राहिले. पण हे शेपूटच आपल्या साऱ्या परिश्रमांवर शिक्कामोर्तब करणारे ठरते. वरील प्रदीर्घ चच्रेतून आपणांशी संवाद साधताना मुलाखतीचे तंत्र उमजले असेल अशी आशा आहे. थोडक्यात काय, तर मुलाखत म्हणजे खेळकर वातावरणात मनमोकळेपणाने तुमची ओळख मुलाखतकर्त्यांना करून देत अधिकारपदासाठी आपली योग्यता पटवून देणे होय. आत्मविश्वासाने सामोरे जात परिश्रम व ज्ञानाच्या कसोटीवर आपण पात्र ठरावे, यासाठी शुभेच्छा. ‘विजयी भव!’

‘एमपीएससी’चा राजमार्ग:मुख्य परीक्षा:मुलाखतीची तयारी

‘एमपीएससी’चा राजमार्ग:मुख्य परीक्षा:मुलाखतीची तयारी

तुकाराम जाधव, गुरुवार, ७ जून २०१२
संचालक, द युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.
malharpatil@gmail.com 
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २०११ सालापर्यंत मुलाखतीसाठी २०० गुण  निर्धारित केले होते. तथापि २०१२ सालापासून मुलाखतीसाठी १०० गुण निश्चित केले आहेत. परंतु यामुळे मुलाखतीच्या स्वरूपामध्ये वा तयारीमध्ये फारसा फरक पडत नाही. गुणांमध्ये तफावत असली, तरी विद्यार्थ्यांनी मुलाखतीच्या तयारीमध्ये आवश्यक असणाऱ्या एकाग्रतेपासून आणि समग्र दृष्टिकोनापासून विचलित होता कामा नये. 
मुलाखतकर्त्यांत साधारणत: एम.पी.एस.सी.चे सदस्य व इतर खात्यांमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा तज्ज्ञ म्हणून समावेश असतो. यांपैकी एम.पी.एस.सी.चे सदस्य हे पॅनेलचे अध्यक्ष म्हणून भूमिका पार पाडतात. इतर सदस्यांत महसूल, पोलीस खात्यांतील तसेच मंत्रालय वा विभागीय आयुक्तालयातील वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांचा समावेश असतो. या सर्वाना प्रशासकीय अधिकारी म्हणून दीर्घकाळच्या सेवेद्वारे विविध विषयांतील माहिती व ज्ञान प्राप्त झालेले असते. राज्याच्या विविध भागांत वेगवेगळ्या पदांवर काम केल्याने त्यांना राज्याच्या भौगोलिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक व सामाजिक बाबींची निश्चित माहिती प्राप्त झालेली असते.
मुलाखतीदरम्यान उमेदवाराच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू जाणून घेतले जातात. पूर्वी नमूद केलेली उमेदवाराच्या गुणांची चाचणी तर घेतली जातेच पण त्याबरोबरच त्याच्या सर्वसामान्य ज्ञानाचा कल, चाकोरीबाहेरील जीवनाबाबतची आस्था, चालू घडामोडींबाबतची जिज्ञासा, शासकीय सेवेत येण्यापाठीमागचे कारण व संबंधित खात्याबाबतची त्याची माहिती या सर्व बाबींतून उमेदवाराचे व्यक्तिमत्त्व पडताळून पाहिले जाते. त्यामुळे मुलाखतीची तयारी करताना नेमकेपणा व योग्य दिशा यांवर अधिक भर द्यावा.
प्रस्तुत टप्प्याची तयारी करण्यासाठी पुढील घटक लक्षात घेणे अत्यावश्यक ठरते. 
(१) बायोडाटा - मुख्य परीक्षेचा अर्ज भरताना उमेदवाराला आपली संपूर्ण व्यक्तिगत माहिती नमूद करावी लागते. हा ‘बायोडाटा’च पायाभूत मानून त्यातील प्रत्येक घटकाची तयारी करावी. यात उमेदवाराचे स्वत:चे नाव, आई-वडिलांचे नाव आणि आडनावासंबंधी माहिती संकलित करावी. आपल्या नावाचा विशिष्ट अर्थ असल्यास तो लक्षात घ्यावा. तसेच आपल्या नावाची एखादी व्यक्ती इतर क्षेत्रात सुप्रसिद्ध असल्यास तिच्याविषयी थोडक्यात माहिती संकलित करावी.  

(२) वास्तव्य - विद्यार्थ्यांनी मूळ ठिकाण, सध्याचे ठिकाण, तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्य असे वर्गीकरण करावे. यातील प्रत्येक घटकाचा थोडक्यात इतिहास, भूगोल, समाजव्यवस्था, राजकारण, अर्थकारण, इतर काही महत्त्वाची वैशिष्टय़े यासंबंधी तयारी करणे अत्यावश्यक ठरते.
(३) शैक्षणिक पाश्र्वभूमी - उमेदवाराची शैक्षणिक पाश्र्वभूमी हा आणखी एक महत्त्वपूर्ण घटक आहे. यात अगदी शालेय शिक्षणापासून, माध्यमिक, उच्चमाध्यमिक , महाविद्यालयीन आणि पदवी-पदव्युत्तर शिक्षणापर्यंतची माहिती निर्णायक ठरते. विशेषत: पदवी शिक्षण आणि त्यातील विशेषत्व ही बाब महत्त्वाची मानावी. ज्या शाखेत आणि विषयात पदवी संपादन केली आहे त्यातील पायाभूत संकल्पना, विचार आणि उपयोजनात्मक भाग यावर लक्ष केंद्रित करावे. शिक्षण संस्थांची नावे आणि ठिकाणे यासंबंधी देखील प्रश्न विचारले जाऊ शकतात हे लक्षात घेऊन त्यासंबंधीही माहिती प्राप्त करावी.
(४) अभ्यासबाह्य बाबीतील रस - उमेदवाराच्या व्यक्तिगत माहितीतील ‘अभ्यासबाह्य बाबीतील रस’ हा घटकही महत्त्वपूर्ण ठरतो. यात विद्यार्थ्यांचा छंद, क्रीडा प्रकारातील रस, विविध स्पर्धात प्राप्त केलेली पारितोषिके, बक्षिसे अशा अभ्यासबाह्य घटकांचा समावेश होतो. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांने या घटकाची प्रभावी तयारी करणे मध्यवर्ती ठरते. अशारीतीने उपरोक्त विविध घटकांची सविस्तर माहिती संकलित करून त्यावर आधारित अधिकाधिक ‘मॉक इंटरव्ह्यूव’चा सराव केल्यास अधिक गुण मिळवता येतील.
(५) चालू घडामोडींविषयी माहिती - आपल्या भोवताली घडणाऱ्या चालू घडामोडींविषयीही अनेक प्रश्न विचारले जातात. राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळी आणि सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक, विज्ञान-तंत्रज्ञान, क्रीडा अशी विभागणी करून त्यासंबंधी महत्त्वाच्या घडामोडींची सविस्तर तयारी करावी. चर्चेतील मुद्दय़ांचे स्वरूप, कारणे, त्यातून निर्माण होणारे प्रश्न, संभाव्य उपाय इ. आयामांसंबंधी तयारी करावी. संबंधित मुद्दय़ांविषयी जी प्रचलित मतमतांतरे आहेत त्याची माहिती उमेदवाराकडे असणे गरजेचे आहे. या महत्त्वाच्या, कळीच्या मुद्दय़ांविषयी स्वत:चे मत असणे महत्त्वाचे ठरते.
(६) पदांचा पसंतिक्रम - पदांच्या पसंतिक्रमाबाबत योग्य स्पष्टीकरण देता यावे. आपले व्यक्तिमत्त्व व आजूबाजूची परिस्थिती यांची आपल्या पसंतिक्रमाशी सांगड घालता आली पाहिजे. अर्थात या वेळीसुद्धा यशस्वी उमेदवारांनी दिलेल्या उत्तरांची पुनरावृत्ती करण्याचा मोह टाळावा. ‘आपले पूर्वायुष्य व आलेले अनुभव यातून प्रशासकीय अधिकारी बनण्याची महत्त्वाकांक्षा निर्माण झाली’, नेमक्या या कारणांचा समावेश आपल्या उत्तरात असावा. दिलेल्या पसंतिक्रमांतील पदांची नेमकी माहिती, त्यांचे अधिकार, कर्तव्य, प्रशासनातील त्या पदाची नेमकी भूमिका याबाबत आपणास प्रश्नांना सामोरे जावे लागते. या पदांशी संबंधित सामाजिक व प्रचलित घडामोडींचे ज्ञान अपेक्षित असते.
तेव्हा स्वत:च्या क्षमतांची तपासणी करण्यास सुरु वात करा व ज्या कमतरता आहेत, त्या दूर करून आत्मविश्वासाने यशाचे शिखर पादाक्रांत करण्यास सुरु वात करा. शिखर तुमची वाट पाहत आहे!

‘एमपीएससी’चा राजमार्ग : मुख्य परीक्षा - मुलाखतीची संकल्पना

‘एमपीएससी’चा राजमार्ग : मुख्य परीक्षा - मुलाखतीची संकल्पना



तुकाराम जाधव - बुधवार, ६ जून २०१२
संचालक, द युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.
malharpatil@gmail.com

मुलाखत अर्थात व्यक्तिमत्त्व चाचणीत अधिक गुण मिळविण्यासाठी प्रथमत:  तिचा नेमका अर्थ लक्षात घेणे महत्त्वपूर्ण ठरते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मुलाखतीस व्यक्तिमत्त्व चाचणी असे संबोधले आहे. म्हणूनच मुलाखतीचा अर्थ उमेदवाराचे व्यक्तिमत्त्व संबंधित पदासाठी सक्षम आहे किंवा नाही याची तपासणी करणे होय. व्यक्तिमत्त्वाची सर्व अंगे मुलाखतीमध्ये विचारात घेतली जातात. कार्यक्षम व निष्पक्ष निरीक्षकांमार्फत लोकसेवेमधील कार्यसंधीसाठी उमेदवारांची व्यक्तिगत सुयोग्यता जोखणे हा मुलाखतीमागील मुख्य उद्देश आहे. यासाठीच्या चाचणीमागील हेतू उमेदवारांची मानसिक क्षमता तोलणे हा आहे. व्यापक अर्थाने हे फक्त त्याची बौद्धिक गुणवैशिष्टय़ांची पडताळणी करणे नसून त्याचबरोबर त्याचा सामाजिक कल व वर्तमान घडामोडीमधील त्याचा रस या संबंधातील पडताळणी करणेदेखील आहे. उमेदवार प्रत्येक गोष्टीबद्दल अवगत वा त्याला प्रत्येक गोष्टीची खडा न् खडा माहिती आहे की नाही, यात मुलाखत मंडळाला रस नसतो. उलटपक्षी एखाद्या गोष्टीबद्दल माहिती नसल्यास वा एखाद्या प्रश्नाचे उत्तर देता येत नसल्यास, तसे सांगण्याची त्याच्यातील प्रामाणिक धमक मुलाखत मंडळाला अभिप्रेत असते. या स्पष्टतेची चाचणी मुलाखतीदरम्यान घेतली जाते. 
मुलाखत मंडळातील अनोळखी सभासदांसमोर तुम्ही किती सहजपणे वागू शकता आणि स्वत:ला किती आत्मविश्वासपूर्वक सादर करू शकता याची चाचणी मुलाखती दरम्यान होत असते. तुमच्या सभोवती घडणाऱ्या महत्त्वाच्या घटनांबाबत तुम्हाला माहिती आहे का? जीवनातील महत्त्वपूर्ण घटनांमधील विविधांगी वास्तवाशी तुम्ही किती परिचित आहात? या घडणाऱ्या घटनांसंबंधी तुम्हाला मत आहे का? त्याचे स्वरूप काय? या माहितीच्या आधारावर तुमची सर्वसाधारण जाणीव कशी आहे हे मुलाखती दरम्यान बघितले जाते. एकंदर उमेदवाराची स्पष्ट व तार्किक विचार करण्याची क्षमता, मत व्यक्त करण्यातील समतोल, आवडीच्या गोष्टीमधील सखोलता आणि महत्त्वपूर्ण विषयांसंदर्भातील ज्ञान याबरोबरच त्याचा आत्मविश्वास, निर्णयक्षमता, आपत्कालीन परिस्थितीस सामोरे जाण्याची क्षमता इ. गुणवैशिष्टय़े तपासली जातात. 
एमपीएससीची मुलाखत ही नुसती तुमच्या ज्ञानाचा आवाका मोजण्यासाठी ठेवलेली औपचारिक बोलचाल नसते. ही तुमच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाची चाचणी असते. तुमचे विषयासंबंधीचे ज्ञान हे मुख्य परीक्षेतील पेपरमध्ये दिसून आलेले असते म्हणूनच तुम्हाला मुलाखतीस बोलावलेले असते. येथे तुम्हालाच स्वत:ची ओळख आहे की नाही हे तपासण्यासाठी बोलावलेले असते. कारण मुलाखत म्हणजे तुमच्या सुज्ञतेची परीक्षा होय (A test of your wisdom) माहिती-विश्लेषण-ज्ञान-व्यवहार उपयोगाची क्षमता म्हणजे सुज्ञता होय. तुम्ही जसे आहात तसे स्वत:ला सादर करण्याचा १०० टक्के प्रयत्न म्हणजे मुलाखत होय. गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर यांनी म्हटल्याप्रमाणे ''Oh god let me not present myself wrongly to the world and set it against me.' असे मुलाखतीमध्ये उमेदवाराने स्वत:ला सादर करावे लागते.  
मुलाखतीमध्ये तुमच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू, तुमचे प्रसंगावधान / हजरजबाबीपणा / समयसूचकता, तुमची निर्णयक्षमता, सामाजिक जाण व बांधीलकी, तुमचे नेतृत्वगुण, सचोटी, प्रामाणिकपणा, कष्ट करण्याची तयारी, जिद्द, लढाऊ वृत्ती, चिकाटी, तुमची प्रयत्नवादी वृत्ती व संभाषणकौशल्य इ. गोष्टी तपासल्या जातात. मुलाखतीसाठी आलेला उमेदवार काय सांगतो, याबरोबरच कसे सांगतो यासही महत्त्व आहे. म्हणजेच आशय अभिव्यक्ती मुलाखत होय. 
एमपीएससीच्या मुलाखतीसाठी २०० गुण ठेवले आहेत. हे २०० गुण एखाद्यास स्पर्धेबाहेरही करू शकतात अथवा आतही घेऊ शकतात. एखाद्यास वर्ग १चे पद मिळेल की वर्ग २चे हेसुद्धा पुष्कळ वेळा या मुलाखतीतील गुणांवरच ठरत असते. त्यामुळे स्वत:ची जागा अंतिम यादीमध्ये आरक्षित करावयाची असेल तर या २०० गुणांवर नजर ठेवलीच पाहिजे.
मुलाखत मंडळ 
मुलाखतीसाठी मुलाखत मंडळामध्ये आयोगाचे अध्यक्ष/ज्येष्ठ सदस्य + वरिष्ठ अधिकारी (पोलीस/इतर खाती)/सनदी अधिकारी (मंत्रालय) असतात. मुलाखतीविषयी विद्यार्थ्यांमध्ये पुष्कळ पूर्वग्रह दिसून येतात. ते असे; (१) उत्तम शैक्षणिक आलेख असल्यासच चांगले गुण मिळतात. (२) सूट-टायसह गेल्यासच चांगले गुण मिळतात. (३) मुलाखतीसाठी वशिला लावावा लागतो. अशा एक ना अनेक शंका-कुशंका स्पर्धकांच्या मनात घर करून असतात. म्हणूनच कोणत्याही पूर्वग्रहांशिवाय जाणे हा गुण मिळविण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. मुलाखत मंडळे ही कोणाशीही पूर्वग्रहाने वागत नसतात. कारण त्यांच्यासाठी तुम्ही फक्त एक स्पर्धक असता. मात्र मुलाखत घेणारे इतके अनुभवी असतात की त्यांना तुमचे व्यक्तिमत्त्व सहज समजून येत असते.
‘मुलाखत’ याचा शब्दश: अर्थ म्हणजे व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व समोरासमोर खुले करणे. मुलाखतीमध्ये विषयातील ज्ञानाऐवजी उमेदवाराच्या व्यक्तिमत्त्वाची चाचणी घेतली जाते. व्यक्तिमत्त्वाची सर्व अंगे मुलाखतीमध्ये विचारात घेतली जातात. मुलाखतीद्वारे उमेदवाराचे व्यक्तिमत्त्व जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे मुलाखतीचा नेमका अभ्यास करताना स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाचे ठळक पैलू सादर करणे आवश्यक ठरते. दुर्दैवाने संभाषणकौशल्य व आत्मविश्वासाचा अभाव असल्याने मुलाखतीला सामोरे जाताना मनात न्यूनगंड निर्माण होतो. परिणामी 'Defeat before starting first bullet'  याप्रमाणे लढाईला सामोरे जाण्यापूर्वीच आपण आपले अपयश अधोरेखित केलेले असते. खरेतर स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाची ओळख आपल्याशिवाय इतर कोणालाही असणे शक्य नाही. त्यामुळे स्वत:ची ओळख सिद्ध करण्यासाठी मुलाखतीद्वारे आपणास सुवर्णसंधी प्राप्त होते.

‘एमपीएससी’चा राजमार्ग:मुख्य परीक्षा:‘सामान्य अध्ययन पेपर ४’:विज्ञान आणि तंत्रज्ञान विकास-नमुना प्रश्न

‘एमपीएससी’चा राजमार्ग:मुख्य परीक्षा:‘सामान्य अध्ययन पेपर ४’:विज्ञान आणि तंत्रज्ञान विकास-नमुना प्रश्न




कैलास भालेकर, मंगळवार, ५ जून २०१२
प्राध्यापक, द युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.
kailasbhalekar@gmail.com 
सामान्य अध्ययन - ४ मधील विज्ञान आणि तंत्रज्ञान विकास या घटकावर  आधारित सरावासाठी नमुना प्रश्न या लेखात देण्यात आलेले आहेत. बरोबर असणारे पर्याय ठळक अक्षरांमध्ये देण्यात आले आहेत. परीक्षेच्या सर्वागीण तयारीसाठी संपूर्ण अभ्यासक्रम अभ्यासणे आवश्यक असून परीक्षाभिमुख तयारीसाठी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.


प्र. १ सोलर फोटोव्होल्टाईक सेल (सौर घट) यासंदर्भातील खालीलपकी कोणती विधाने बरोबर आहेत?
विधान (अ) : सोलर फोटोव्होल्टाईक सेलमध्ये सौरऊर्जेचे रूपांतर विद्युतऊर्जेमध्ये करतात.
विधान (ब) : सोलर फोटोव्होल्टाईक सेलमध्ये अर्धवाहकाचा (सेमिकंडक्टर) वापर करतात.
विधान (क) : सोलर फोटोव्होल्टाईक घट हा पारंपरिक ऊर्जास्रोत आहे.
(१) विधान (अ) बरोबर (२) विधान (अ), (ब) बरोबर  
(३) विधान (अ), (क) बरोबर (४) विधान (ब), (क) बरोबर
प्र. २ भारतीय अणुऊर्जा कार्यक्रमासंदर्भातील टप्प्यांचा अचूक क्रम कोणता?
(अ) प्रेशराईज्ड हेवी वॉटर रिअ‍ॅक्टर (PHWR)
(ब) थोरिअमवर आधारित अणूभट्टय़ा
(क) फास्ट ब्रीडर रिअ‍ॅक्टर
(१) अ, क, ब (२) ब, क, अ (३) अ, ब, क (४) ब, अ, क
प्र. ३    महासंगणकाची (सुपर कॉम्प्युटर) कार्यक्षमता मोजण्यासाठी वापरण्यात येणारे फ्लॉप्स (ो’स्र्२) म्हणजे ..
(१) फर्स्ट ऑपरेशन्स पर सेकंद (२) फ्रिक्वेन्सी ऑफ ऑपरेशन्स पर सेकंद  
(३) फ्लोटिंग पॉइंट ऑपरेशन्स पर सेकंद (४) यांपकी नाही.
प्र. ४ ‘आधार’ कार्डासंदर्भातील खालीलपकी कोणती विधाने बरोबर आहेत?
विधान (अ) : बायोमेट्रिक माहितीद्वारे नागरिकांक देण्यात येतो.
विधान (ब) : ‘आधार’कार्डाद्वारे दिला जाणारा नागरिकांक ‘१२ अंकी’ आहे.
(१) विधान (अ) बरोबर (२) विधान (ब) बरोबर  
(३) दोन्हीही विधाने बरोबर (४) दोन्हीही विधाने चूक
प्र. ५ राष्ट्रीय ई-प्रशासन योजनेसंदर्भातील खालीलपकी कोणती विधाने बरोबर आहेत?
विधान (अ) : राष्ट्रीय ई-प्रशासन योजनेंतर्गत २७ अभियान प्रकल्पांचा (मिशन मोड प्रोजेक्टचा) समावेश करण्यात आला आहे.
विधान (ब) : राष्ट्रीय ई-प्रशासन योजनेंतर्गत सार्वजनिक सुविधा केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे.
विधान (क) : राष्ट्रीय ई-प्रशासन योजनेची अंमलबजावणी फक्त केंद्र शासन स्तरावर केली जाणार आहे.
(१) विधान (अ), (ब) बरोबर (२) विधान (अ), (क) बरोबर  
(३) विधान (ब), (क) बरोबर (४) विधान (अ), (ब), (क) बरोबर
प्र. ६    क्रायोजेनिक इंजिनमध्ये ..
(१) सामान्य तापमानाला हायड्रोजनचा इंधन म्हणून तर शीत तापमानाला ऑक्सिजनचा ऑक्सिडीकारक म्हणून वापर करतात.  
(२) शीत तापमानाला हायड्रोजनचा इंधन म्हणून तर शीत तापमानाला ऑक्सिजनचा ऑक्सिडीकारक म्हणून वापर करतात.
(३) शीत तापमानाला हायड्रोजनचा इंधन म्हणून तर सामान्य तापमानाला ऑक्सिजनचा ऑक्सिडीकारक म्हणून वापर करतात.  
(४) यांपकी नाही.
प्र. ७ खालीलपकी चुकीची जोडी ओळखा.
(१) रिसोर्स सॅट : संसाधनविषयक माहितीसाठीचा उपग्रह  
(२) ओशन सॅट : सागरी संशोधनासाठीचा उपग्रह
(३) हॅम सॅट : हवामानविषयक माहितीसाठीचा उपग्रह
(४) कार्टे सॅट : अद्ययावत नकाशाविषयक माहितीसाठीचा उपग्रह
प्र. ८ ‘बीटी’ कापूसमध्ये ‘बीटी’ हा घटक म्हणजे ..
(१) बेसिक थुरिन जेनिसीस (२) बॅसिलस थुरिन जेनिसीस
(३) बायोकॅटॅलिस्ट थुरिन जेनिसीस (४) यांपकी नाही
प्र. ९ होलोग्राफी तंत्राच्या संदर्भातील खालीलपकी कोणती विधाने बरोबर आहेत?
विधान (अ) : होलोग्राफीद्वारे त्रिमिती चित्रनिर्मिती करता येते.
विधान (ब) : ‘लेसर’ किरणांचा वापर होलोग्राफीसाठी केला जाऊ शकतो.
(१) विधान (अ) बरोबर (२) विधान (ब) बरोबर  
(३) दोन्हीही विधाने बरोबर (४) दोन्हीही विधाने चूक
प्र.  १० राष्ट्रीय दूरसंवेदी केंद्र (नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर) खालीलपकी कोणत्या ठिकाणी आहे?
(१) चेन्नई (२) तिरुअनंतपूरम (३) हैदराबाद (४) बंगलोर
प्र. ११    राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेसंदर्भातील (NDMA) खालीलपकी कोणती विधाने बरोबर आहेत?
विधान (अ) : आपत्ती व्यवस्थापनासाठीची धोरणे, योजना आणि मार्गदर्शक तत्त्वे ठरविणारी ही भारतातील सर्वोच्च यंत्रणा आहे.
विधान (ब) : राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचे चेअरमन भारताचे गृहमंत्री असतात.
(१) विधान (अ) बरोबर (२) विधान (ब) बरोबर  
(३) दोन्हीही विधाने बरोबर (४) दोन्हीही विधाने चूक
संपूर्ण अभ्यासक्रमाचे विश्लेषण करून परीक्षाभिमुख तयारी करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान विकास या घटकामधील संकल्पनांचे आकलन आणि उपयोजन यावर भर देण्याची गरज आहे. तसेच, विज्ञान आणि तंत्रज्ञान विकास यामधील प्रचलित घडामोडी, शासकीय कार्यक्रम, योजना आणि धोरणे यांची माहितीदेखील महत्त्वाची ठरेल.

‘एमपीएससी’चा राजमार्ग : मुख्य परीक्षा - सामान्य अध्ययन-४ : ‘विज्ञान आणि तंत्रज्ञान विकास’ घटकाची तयारी - ४

‘एमपीएससी’चा राजमार्ग : मुख्य परीक्षा - सामान्य अध्ययन-४ : ‘विज्ञान आणि तंत्रज्ञान विकास’ घटकाची तयारी - ४

कैलास भालेकर - सोमवार, ४ जून २०१२
प्राध्यापक, द युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.

kailasbhalekar@gmail.com 
‘अणुऊर्जा’ भारताच्या ऊर्जा कार्यक्रमातील महत्त्वाचा घटक असून  भारताच्या ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने अणुऊर्जा विकासाची महत्त्वाची भूमिका आहे. अणुऊर्जेचे सद्य:स्थितीतील महत्त्व कोणते आहे? अणुऊर्जेचे स्वच्छ ऊर्जास्रोत म्हणून काय महत्त्व आहे? यासारख्या बाबींच्या तयारीबरोबरच भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमांच्या महत्त्वाच्या टप्प्यांची तयारी करावी लागते. भारताच्या आण्विक धोरणाच्या वैशिष्टय़ांची माहिती आवश्यक आहे. त्यासंदर्भातील राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय महत्त्वपूर्ण घडामोडींचे आकलन आवश्यक आहे. आण्विक प्रसारबंदी कायदा (एन.पी.टी.), र्सवकष चाचणी बंदी करार (सी.टी.बी.टी.) यांसारख्या आंतरराष्ट्रीय करारांच्या महत्त्वाच्या तरतुदींच्या आकलनाबरोबरच भारताच्या या करारासंदर्भात असणाऱ्या भूमिकेबाबत माहिती आवश्यक ठरते. भारताच्या अणुचाचण्या पोखरण - १ (१९७४) आणि पोखरण - २ (१९९८) या संदर्भातील महत्त्वपूर्ण बाबींचे संकलन या घटकाच्या तयारीतील महत्त्वाचा भाग ठरतो.
भारत-अमेरिका अणुकरार २००९ मधील महत्त्वाच्या तरतुदींचे आणि प्रभावाचे वस्तुनिष्ठ आकलन महत्त्वाचे आहे. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा यंत्रणा यांसारख्या यंत्रणांची माहिती मिळविणे उपयुक्त ठरते. अणुऊर्जा प्रकल्पांची सुरक्षितता आणि अणुऊर्जा प्रकल्पांतील टाकाऊ पदार्थाची विल्हेवाट हा एक महत्त्वाचा घटक असून त्यासंदर्भातील विविध घडामोडींची आणि विविध उपाययोजनांची माहिती मिळविणे गरजेचे आहे. अणुऊर्जा आणि आण्विक धोरणांसंदर्भातील माहिती मिळविताना परीक्षेच्या वस्तुनिष्ठ स्वरूपाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
‘आपत्ती व्यवस्थापन’ या उपघटकाचा समावेश विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विकास या घटकांतर्गत करण्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापनाची व्याख्या, स्वरूप आणि आपत्तीचे वर्गीकरण या बाबींची तयारी हा आपत्ती व्यवस्थापन उपघटकाच्या तयारीतील महत्त्वाचा भाग ठरतो. आपत्ती व्यवस्थापनासाठी कार्यरत असणाऱ्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेची रचना आणि कार्यपद्धती यांची माहिती मिळविणे आवश्यक ठरते. 
आपत्ती व्यवस्थापनाची आवश्यकता कोणती आहे? आपत्ती व्यवस्थापनामध्ये कोणत्या बाबींचा समावेश होतो? यांसारख्या बाबींच्या तयारीवर भर द्यावा लागतो. पूर, भूकंप, सुनामी, दरड कोसळणे यांसारख्या नसíगक आपत्तींचे स्वरूप आणि या नसíगक आपत्तींसाठीच्या महत्त्वाच्या कारणांचे आकलन आवश्यक ठरते. या नसíगक आपत्तींचा प्रभाव नेमका कोणत्या ठिकाणी अधिक आहे? नसíगक आपत्तींच्या धोक्यांच्या पूर्वसूचनांची आवश्यकता आणि धोक्यांच्या पूर्वसूचना मिळविण्याचे तंत्र या बाबतीतील अद्ययावत संदर्भासह तयारी महत्त्वाची आहे. नसíगक आपत्तीच्या धोक्यांची पूर्वसूचना देण्यासाठी कार्यरत असणाऱ्या भारतातील यंत्रणांची आणि या यंत्रणांच्या कार्यपद्धतीच्या माहितीचे संकलन महत्त्वाचे आहे. नसíगक आपत्तीची तीव्रता कमी करण्यासाठीच्या विविध उपाययोजना कोणत्या आहेत? त्या उपाययोजनांवर कोणत्या बाबींचा प्रभाव पडतो यांसारख्या बाबींचे आकलनदेखील ‘आपत्ती व्यवस्थापन’ उपघटकाच्या तयारीसाठी महत्त्वपूर्ण ठरते. 
‘आपत्ती व्यवस्थापन’ या उपघटकामध्ये काही केस स्टडीजचा देखील समावेश केला आहे. अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट असणाऱ्या केस स्टडीजचा अभ्यास अत्यंत नेमकेपणाने आणि सूक्ष्मरीत्या करण्याची आवश्यकता आहे. केस स्टडीजमध्ये किल्लारी भूकंप (१९९३), भूज भूकंप (२००१), सिक्कीम-नेपाळ भूकंप (२०११) या भूकंपांचा समावेश आहे. या केस स्टडीजचा अभ्यास करण्यासाठी इंटरनेटवरील माहिती फायदेशीर ठरेल. इंटरनेटवरून या माहितीच्या नोट्स नेमकेपणाने संकलित करणे गरजेचे आहे. या माहितीवर आधारित कोणत्या प्रकारचे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न विचारले जाऊ शकतात, या संभाव्य स्वरूपाच्या साहाय्याने केलेला अभ्यास उपयुक्त ठरतो. काही महत्त्वाचे संदर्भ कायम अभ्यासण्याची आवश्यकता असल्याने छोटय़ा डायरीतील नेमक्या नोट्स रिव्हिजनसाठी फायदेशीर ठरतात. अर्थातच, केस स्टडीजचा अभ्यास अत्यंत उपयोजित स्वरूपात आणि संकल्पनांच्या आधारे करावा लागतो. उदा., भूकंपासंदर्भातील केस स्टडीजचा अभ्यास करताना रिश्टर प्रमाण यांसारख्या संकल्पनेचे आकलन आवश्यक ठरते. 
बँदा ऑके (२००४) मधील सुनामीची आपत्ती आणि २०११ मधील फुकुशिमा भूकंप आणि सुनामीची आपत्ती या आंतरराष्ट्रीय स्तरावरील नसíगक आपत्तींचा समावेशदेखील अभ्यासक्रमात करण्यात आला आहे. या नसíगक आपत्तींचे स्वरूप समजावून घेण्यासाठी आपत्तीशी निगडित महत्त्वाच्या संकल्पना उदा. सुनामी म्हणजे काय? समजावून घेणे महत्त्वाचे ठरते. फुकुशिमा नसíगक आपत्तीमध्ये झालेल्या आण्विक अपघाताच्या माहितीचे संकलनदेखील महत्त्वाचे आहे. आण्विक अपघाताची कारणे अणुभट्टय़ांच्या संदर्भाबरोबरच सुनामी आणि भूकंपाच्या आपत्तीसंदर्भात करणेदेखील गरजेचे आहे. तसेच, आपत्तीची तीव्रता कमी करण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांचे नेमके आकलन महत्त्वाचे आहे. 
२००५ मधील मुंबईमधील पुराचा नसíगक आपत्तीच्या केस स्टडीचा समावेश अभ्यासक्रमात असून, मुंबईतील २००५मधील पुरासाठी कोणते घटक कारणीभूत ठरले? पुराची तीव्रता वाढण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या नेमक्या घडामोडींची माहिती मिळविण्याबरोबरच तीव्रता कमी करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती महत्त्वाची आहे. पुरामुळे झालेली हानी, आपत्ती व्यवस्थापनामधील त्रुटी आणि भविष्यामध्ये अशा आपत्ती होऊ नयेत यासाठी केलेल्या उपाययोजना आणि यंत्रणा यांची नेमकी माहितीदेखील महत्त्वाची आहे. महाराष्ट्रातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि पुराच्या धोक्याची पूर्वसूचना देणारी यंत्रणा, हवामान अंदाज यंत्रणा आणि समन्वय यंत्रणा या बाबींच्या तयारीवर भर देणे उपयुक्त ठरेल. डिसेंबर १९९३, जून २००६, नोव्हेंबर २००९ मध्ये झालेल्या बाँबहल्ला आणि २०११ मधील बाँबहल्ला आणि दहशतवादी हल्ला या आपत्तींच्या केस स्टडीज अभ्यासणे आवश्यक आहे. या केस स्टडीजचा अभ्यास अत्यंत नेमकेपणाने करण्याची गरज असून बाँबहल्ल्यामुळे आणि दहशतवादी हल्ल्यामुळे झालेली हानी अभ्यासणे आवश्यक ठरते. या प्रकारचे हल्ले रोखण्यासंदर्भातील उपाययोजना आणि यंत्रणा यांचा अभ्यास आवश्यक ठरतो. 
विज्ञान आणि तंत्रज्ञान विकास घटकाचा अभ्यास करताना संकल्पनांच्या आकलनाबरोबरच नेमक्या उपयोजित संदर्भावर भर देणे उपयुक्त ठरते.

‘एमपीएससी’चा राजमार्ग : मुख्य परीक्षा - सामान्य अध्ययन-४. ‘विज्ञान आणि तंत्रज्ञान विकास’ घटकाची तयारी-३

‘एमपीएससी’चा राजमार्ग : मुख्य परीक्षा - सामान्य अध्ययन-४. ‘विज्ञान आणि तंत्रज्ञान विकास’ घटकाची तयारी-३



कैलास भालेकर - शनिवार, २ जून २०१२
प्राध्यापक, द युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.

kailasbhalekar@gmail.com

जैवतंत्रज्ञान क्षेत्राचा विकास भारताच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विकासातील महत्त्वाचा टप्पा असून जैवतंत्रज्ञानाचे मानवी जीवनामध्ये सुधारणा घडवून आणण्याचे सामथ्र्य मोठे आहे. भारताच्या कृषी क्षेत्रातील प्रगतीसाठी जैवतंत्रज्ञान क्षेत्राचे योगदान मोठे आहे. भारताच्या कृषी क्षेत्रातील उत्पादकता आणि उत्पन्न वाढविणे ही आव्हानात्मक बाब असून जैवतंत्रज्ञानाची भूमिका त्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरते. जैवतंत्रज्ञानामध्ये अधिक उत्पादन असणारी, पाण्याचा ताण सहन करणारी आणि अधिक रोगप्रतिकारक क्षमता असणारे पिकांचे वाण विकसित करण्यासाठी संशोधन केले जात आहे. जैवतंत्रज्ञानाच्या उपयोजनाने पिकांची उत्पादकता वाढविण्याबरोबरच टिकाऊपणा आणि उपयुक्तता वाढविणे शक्य ठरते. भारताच्या कृषी क्षेत्रातील प्रगतीसाठी जैवतंत्रज्ञानाचा विकास आवश्यक असून जैवतंत्रज्ञान क्षेत्राच्या प्रगतीसाठी कार्यरत असणाऱ्या यंत्रणांची माहिती हा ‘जैवतंत्रज्ञान’ उपघटकाच्या तयारीतील महत्त्वाचा टप्पा ठरतो.
जैवतंत्रज्ञानाचे औद्योगिक उपयोजनदेखील महत्त्वाचे असून भारतातील जैवतंत्रज्ञान क्षेत्राने आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे. जैवतंत्रज्ञान उद्योगामध्ये संशोधन आणि विकास मोठय़ा प्रमाणात होत असून, आगामी कालावधीत जैवतंत्रज्ञान क्षेत्रामध्ये अधिक संधी निर्माण करण्याची जैवतंत्रज्ञान क्षेत्राची क्षमता मोठी आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेच्या विकासाचा रोजगारनिर्मिती हा महत्त्वाचा घटक आहे. जैवतंत्रज्ञान क्षेत्राची रोजगारनिर्मिती क्षमता आगामी कालावधीत खूपच महत्त्वाची ठरेल. जैवतंत्रज्ञानामुळे औद्योगिक क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊ शकतील. भारतामध्ये प्रशिक्षित मनुष्यबळाला मोठी संधी उपलब्ध होऊ शकेल. जैवतंत्रज्ञान उद्योगातील विविध प्रवाहांचे आकलन या घटकाच्या तयारीसाठी आवश्यक आहे. जैवतंत्रज्ञानातील महत्त्वाच्या संकल्पना समजून घेऊन त्यावर आधारित कशा प्रकारचे प्रश्न अपेक्षित आहेत याचा अंदाज घेऊन या घटकाची तयारी करता येते. जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील महत्त्वाच्या संकल्पनांचे आकलन विज्ञान-तंत्रज्ञानाच्या संदर्भपुस्तकांच्या साहाय्याने करता येते. तसेच, इंटरनेटवरदेखील यासंदर्भात माहिती उपलब्ध असते. इंटरनेटवरील माहितीचे संकलन करून त्याच्या नोट्स बनविल्यास जलद आणि सुलभरीत्या अभ्यास करणे शक्य होते.
जैवतंत्रज्ञानाचे अन्न तंत्रज्ञान क्षेत्रातदेखील उपयोजन आहे. त्यासंदर्भातील संशोधनातील महत्त्वपूर्ण बाबींचे अद्ययावत आकलन आवश्यक आहे. पर्यावरणदृष्टय़ा जैवतंत्रज्ञानाचे उपयोजन आणि पर्यावरणविषयक विकासासाठी जैवतंत्रज्ञान संशोधनाचे महत्त्वाचे टप्पे या बाबींचे आकलनदेखील महत्त्वाचे आहे. जैवतंत्रज्ञान क्षेत्राचा विकास ऊर्जानिर्मितीसाठीदेखील महत्त्वाचा असून, त्यासंदर्भातील प्रचलित घडामोडींचे संकलन या उपघटकाच्या तयारीसाठी उपयुक्त ठरेल. भारताच्या नसíगक साधनसंपत्तीच्या विकासासाठी जैवतंत्रज्ञान विकासाचे योगदान मोठे असून त्यासाठी शासनाद्वारे राबविलेले कार्यक्रम, योजना आणि कार्यरत असणाऱ्या यंत्रणांचा अभ्यास आवश्यक ठरतो. या बाबींच्या माहितीसाठी शासनाच्या वेबसाईटचा आणि ‘इंडिया इयर बुक’ या पुस्तकाचा संदर्भ घेता येतो.
‘जनुकीय अभियांत्रिकी’ या संकल्पनेच्या आकलनाबरोबरच जनुकीय अभियांत्रिकीचे उपयोजन कोणकोणत्या क्षेत्रात होते याची माहिती आवश्यक ठरते. जनुकीय अभियांत्रिकीची पशुसंवर्धन क्षेत्रामध्ये असलेल्या उपयोजनाचे संकल्पनात्मक आकलन महत्त्वाचे आहे. भारतामध्ये दुधाची उपलब्धता वाढविण्यासाठी पशुसंवर्धन महत्त्वाचे आहे. पशुसंवर्धनाची उत्पादकता वाढविण्यासाठी जनुकीय अभियांत्रिकीतील संशोधन महत्त्वाचे आहे. पशुसंवर्धन क्षेत्रात विशेषत: पशु-आरोग्य क्षेत्रात जनुकीय अभियांत्रिकी महत्त्वाची असून सद्य:स्थितीतील त्यासंदर्भातील विविध घडामोडींची वस्तुनिष्ठ माहिती मिळविणे गरजेचे ठरते.
‘अन्नसुरक्षा’ निर्माण करण्यासाठी अन्नधान्याचे उत्पादन वाढविणे आवश्यक ठरते. अन्नधान्याचे उत्पादन वाढविण्यासाठी अन्नधान्याच्या उत्पादकतेत वाढ महत्त्वाची ठरते. त्यादृष्टीने जनुकीय बदल घडविलेले अन्नधान्य हा एक महत्त्वाचा पर्याय ठरतो. जनुकीय बदल घडविलेले अन्न (जेनेटीकली मॉडीफाईड फूड) यामध्ये सध्या संशोधन होत असून, जनुकीय बदल घडविलेल्या अन्न उपयोजनासंदर्भात असणाऱ्या महत्त्वाच्या प्रवाहांचे आकलन आवश्यक आहे. जनुकीय बदल घडविलेले अन्न यासंदर्भात नियमनांची आवश्यकता आहे. तसेच जनुकीय बदल घडविलेले अन्न या संदर्भातील महत्त्वाच्या तंत्रज्ञानविषयक संकल्पनात्मक बाबींचे आकलन हादेखील या उपघटकाच्या तयारीतील महत्त्वाचा भाग ठरतो. जनुकीय अभियांत्रिकीद्वारे निर्मित पिकांच्या वाणांच्या विकासासाठी संशोधन होत आहे. जनुकीय अभियांत्रिकीच्या उपयोजनासंदर्भात विविध नियमने असून या नियमनांची आणि नियामक यंत्रणांची माहिती उपयुक्त ठरते.
जनुकीय उपचार (जीन थेरपी) यांसारख्या संकल्पनांचे आकलन आवश्यक असून जनुकीय उपचाराचे महत्त्व कोणते आहे? सध्या यासंदर्भात झालेल्या संशोधनांची माहिती मिळविता येते. या सर्व बाबींशी संबंधित समस्यांचे आकलन हा या उपघटकाच्या तयारीतील महत्त्वाचा भाग आहे. जनुकीय उपचारासंदर्भात आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घडामोडींचे आकलनदेखील उपयुक्त ठरेल. जैवतंत्रज्ञान विकासाशी निगडित नतिक, सामाजिक आणि कायदेशीर बाबींची माहिती मिळविताना संभाव्य परिणामांची माहिती मिळविणेदेखील उपयुक्त ठरते. या संदर्भातील शासकीय उपाययोजना, धोरणे आणि नियमने अद्ययावत माहितीचे संकलन उपयुक्त ठरेल.
जनुकीय अभियांत्रिकीद्वारे उत्पादित बियाणे आणि त्यांच्या गुणवत्ताविषयक आकलन महत्त्वाचे आहे. त्यासंदर्भातील अलीकडील कालावधीत महत्त्वपूर्ण प्रवाहांचा वेध घेणे गरजेचे ठरते. अर्थातच ही तयारी वस्तुनिष्ठ संदर्भासह करणे महत्त्वाचे आहे. बीटी कापूस, बीटी वांगे यांसारख्या बियाण्यांची माहिती आणि त्यासंदर्भातील महत्त्वाच्या धोरणांची माहिती मिळविता येते.
जैवतंत्रज्ञानाला प्रोत्साहन देणाऱ्या शासनाच्या धोरणांची माहिती अद्ययावत संदर्भासह करणे आवश्यक ठरते. जैवतंत्रज्ञान घटकाच्या तयारीसाठी अद्ययावत संदर्भाच्या आकलनावर भर द्यावा लागतो.

‘एमपीएससी’चा राजमार्ग : मुख्य परीक्षा - सामान्य अध्ययन-४. ‘विज्ञान आणि तंत्रज्ञान विकास’ घटकाची तयारी-३

‘एमपीएससी’चा राजमार्ग : मुख्य परीक्षा - सामान्य अध्ययन-४. ‘विज्ञान आणि तंत्रज्ञान विकास’ घटकाची तयारी-३



कैलास भालेकर - शनिवार, २ जून २०१२
प्राध्यापक, द युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.

kailasbhalekar@gmail.com

जैवतंत्रज्ञान क्षेत्राचा विकास भारताच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विकासातील महत्त्वाचा टप्पा असून जैवतंत्रज्ञानाचे मानवी जीवनामध्ये सुधारणा घडवून आणण्याचे सामथ्र्य मोठे आहे. भारताच्या कृषी क्षेत्रातील प्रगतीसाठी जैवतंत्रज्ञान क्षेत्राचे योगदान मोठे आहे. भारताच्या कृषी क्षेत्रातील उत्पादकता आणि उत्पन्न वाढविणे ही आव्हानात्मक बाब असून जैवतंत्रज्ञानाची भूमिका त्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरते. जैवतंत्रज्ञानामध्ये अधिक उत्पादन असणारी, पाण्याचा ताण सहन करणारी आणि अधिक रोगप्रतिकारक क्षमता असणारे पिकांचे वाण विकसित करण्यासाठी संशोधन केले जात आहे. जैवतंत्रज्ञानाच्या उपयोजनाने पिकांची उत्पादकता वाढविण्याबरोबरच टिकाऊपणा आणि उपयुक्तता वाढविणे शक्य ठरते. भारताच्या कृषी क्षेत्रातील प्रगतीसाठी जैवतंत्रज्ञानाचा विकास आवश्यक असून जैवतंत्रज्ञान क्षेत्राच्या प्रगतीसाठी कार्यरत असणाऱ्या यंत्रणांची माहिती हा ‘जैवतंत्रज्ञान’ उपघटकाच्या तयारीतील महत्त्वाचा टप्पा ठरतो.
जैवतंत्रज्ञानाचे औद्योगिक उपयोजनदेखील महत्त्वाचे असून भारतातील जैवतंत्रज्ञान क्षेत्राने आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे. जैवतंत्रज्ञान उद्योगामध्ये संशोधन आणि विकास मोठय़ा प्रमाणात होत असून, आगामी कालावधीत जैवतंत्रज्ञान क्षेत्रामध्ये अधिक संधी निर्माण करण्याची जैवतंत्रज्ञान क्षेत्राची क्षमता मोठी आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेच्या विकासाचा रोजगारनिर्मिती हा महत्त्वाचा घटक आहे. जैवतंत्रज्ञान क्षेत्राची रोजगारनिर्मिती क्षमता आगामी कालावधीत खूपच महत्त्वाची ठरेल. जैवतंत्रज्ञानामुळे औद्योगिक क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊ शकतील. भारतामध्ये प्रशिक्षित मनुष्यबळाला मोठी संधी उपलब्ध होऊ शकेल. जैवतंत्रज्ञान उद्योगातील विविध प्रवाहांचे आकलन या घटकाच्या तयारीसाठी आवश्यक आहे. जैवतंत्रज्ञानातील महत्त्वाच्या संकल्पना समजून घेऊन त्यावर आधारित कशा प्रकारचे प्रश्न अपेक्षित आहेत याचा अंदाज घेऊन या घटकाची तयारी करता येते. जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील महत्त्वाच्या संकल्पनांचे आकलन विज्ञान-तंत्रज्ञानाच्या संदर्भपुस्तकांच्या साहाय्याने करता येते. तसेच, इंटरनेटवरदेखील यासंदर्भात माहिती उपलब्ध असते. इंटरनेटवरील माहितीचे संकलन करून त्याच्या नोट्स बनविल्यास जलद आणि सुलभरीत्या अभ्यास करणे शक्य होते.
जैवतंत्रज्ञानाचे अन्न तंत्रज्ञान क्षेत्रातदेखील उपयोजन आहे. त्यासंदर्भातील संशोधनातील महत्त्वपूर्ण बाबींचे अद्ययावत आकलन आवश्यक आहे. पर्यावरणदृष्टय़ा जैवतंत्रज्ञानाचे उपयोजन आणि पर्यावरणविषयक विकासासाठी जैवतंत्रज्ञान संशोधनाचे महत्त्वाचे टप्पे या बाबींचे आकलनदेखील महत्त्वाचे आहे. जैवतंत्रज्ञान क्षेत्राचा विकास ऊर्जानिर्मितीसाठीदेखील महत्त्वाचा असून, त्यासंदर्भातील प्रचलित घडामोडींचे संकलन या उपघटकाच्या तयारीसाठी उपयुक्त ठरेल. भारताच्या नसíगक साधनसंपत्तीच्या विकासासाठी जैवतंत्रज्ञान विकासाचे योगदान मोठे असून त्यासाठी शासनाद्वारे राबविलेले कार्यक्रम, योजना आणि कार्यरत असणाऱ्या यंत्रणांचा अभ्यास आवश्यक ठरतो. या बाबींच्या माहितीसाठी शासनाच्या वेबसाईटचा आणि ‘इंडिया इयर बुक’ या पुस्तकाचा संदर्भ घेता येतो.
‘जनुकीय अभियांत्रिकी’ या संकल्पनेच्या आकलनाबरोबरच जनुकीय अभियांत्रिकीचे उपयोजन कोणकोणत्या क्षेत्रात होते याची माहिती आवश्यक ठरते. जनुकीय अभियांत्रिकीची पशुसंवर्धन क्षेत्रामध्ये असलेल्या उपयोजनाचे संकल्पनात्मक आकलन महत्त्वाचे आहे. भारतामध्ये दुधाची उपलब्धता वाढविण्यासाठी पशुसंवर्धन महत्त्वाचे आहे. पशुसंवर्धनाची उत्पादकता वाढविण्यासाठी जनुकीय अभियांत्रिकीतील संशोधन महत्त्वाचे आहे. पशुसंवर्धन क्षेत्रात विशेषत: पशु-आरोग्य क्षेत्रात जनुकीय अभियांत्रिकी महत्त्वाची असून सद्य:स्थितीतील त्यासंदर्भातील विविध घडामोडींची वस्तुनिष्ठ माहिती मिळविणे गरजेचे ठरते.
‘अन्नसुरक्षा’ निर्माण करण्यासाठी अन्नधान्याचे उत्पादन वाढविणे आवश्यक ठरते. अन्नधान्याचे उत्पादन वाढविण्यासाठी अन्नधान्याच्या उत्पादकतेत वाढ महत्त्वाची ठरते. त्यादृष्टीने जनुकीय बदल घडविलेले अन्नधान्य हा एक महत्त्वाचा पर्याय ठरतो. जनुकीय बदल घडविलेले अन्न (जेनेटीकली मॉडीफाईड फूड) यामध्ये सध्या संशोधन होत असून, जनुकीय बदल घडविलेल्या अन्न उपयोजनासंदर्भात असणाऱ्या महत्त्वाच्या प्रवाहांचे आकलन आवश्यक आहे. जनुकीय बदल घडविलेले अन्न यासंदर्भात नियमनांची आवश्यकता आहे. तसेच जनुकीय बदल घडविलेले अन्न या संदर्भातील महत्त्वाच्या तंत्रज्ञानविषयक संकल्पनात्मक बाबींचे आकलन हादेखील या उपघटकाच्या तयारीतील महत्त्वाचा भाग ठरतो. जनुकीय अभियांत्रिकीद्वारे निर्मित पिकांच्या वाणांच्या विकासासाठी संशोधन होत आहे. जनुकीय अभियांत्रिकीच्या उपयोजनासंदर्भात विविध नियमने असून या नियमनांची आणि नियामक यंत्रणांची माहिती उपयुक्त ठरते.
जनुकीय उपचार (जीन थेरपी) यांसारख्या संकल्पनांचे आकलन आवश्यक असून जनुकीय उपचाराचे महत्त्व कोणते आहे? सध्या यासंदर्भात झालेल्या संशोधनांची माहिती मिळविता येते. या सर्व बाबींशी संबंधित समस्यांचे आकलन हा या उपघटकाच्या तयारीतील महत्त्वाचा भाग आहे. जनुकीय उपचारासंदर्भात आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घडामोडींचे आकलनदेखील उपयुक्त ठरेल. जैवतंत्रज्ञान विकासाशी निगडित नतिक, सामाजिक आणि कायदेशीर बाबींची माहिती मिळविताना संभाव्य परिणामांची माहिती मिळविणेदेखील उपयुक्त ठरते. या संदर्भातील शासकीय उपाययोजना, धोरणे आणि नियमने अद्ययावत माहितीचे संकलन उपयुक्त ठरेल.
जनुकीय अभियांत्रिकीद्वारे उत्पादित बियाणे आणि त्यांच्या गुणवत्ताविषयक आकलन महत्त्वाचे आहे. त्यासंदर्भातील अलीकडील कालावधीत महत्त्वपूर्ण प्रवाहांचा वेध घेणे गरजेचे ठरते. अर्थातच ही तयारी वस्तुनिष्ठ संदर्भासह करणे महत्त्वाचे आहे. बीटी कापूस, बीटी वांगे यांसारख्या बियाण्यांची माहिती आणि त्यासंदर्भातील महत्त्वाच्या धोरणांची माहिती मिळविता येते.
जैवतंत्रज्ञानाला प्रोत्साहन देणाऱ्या शासनाच्या धोरणांची माहिती अद्ययावत संदर्भासह करणे आवश्यक ठरते. जैवतंत्रज्ञान घटकाच्या तयारीसाठी अद्ययावत संदर्भाच्या आकलनावर भर द्यावा लागतो.

‘एमपीएससी’चा राजमार्ग : मुख्य परीक्षा - सामान्य अध्ययन-४. ‘विज्ञान आणि तंत्रज्ञान विकास’ घटकाची तयारी-२

‘एमपीएससी’चा राजमार्ग : मुख्य परीक्षा - सामान्य अध्ययन-४. ‘विज्ञान आणि तंत्रज्ञान विकास’ घटकाची तयारी-२



कैलास भालेकर - शुक्रवार, १ जून २०१२
प्राध्यापक, द युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.

kailasbhalekar@gmail.com

अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीचे भारताच्या तंत्रज्ञान प्रगतीमध्ये अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. भारताच्या अवकाश कार्यक्रमातील विविध टप्प्यांचे तंत्रज्ञानविषयक आकलन हा या घटकाच्या तयारीतील महत्त्वाचा भाग आहे. अवकाश संशोधन क्षेत्रामध्ये होणाऱ्या अद्ययावत घडामोडींच्या आकलनावरदेखील भर द्यावा लागतो. कृत्रिम उपग्रहांची उभारणी, उपग्रह प्रक्षेपक तंत्रज्ञान आणि कृत्रिम उपग्रहांचे उपयोजन यामध्ये समाविष्ट होणाऱ्या तंत्रज्ञानविषयक संकल्पना समजून घेऊन त्या संकल्पनांचे सद्य:स्थितीतील आकलन करणे आवश्यक ठरते. भारताच्या उपग्रह प्रक्षेपकांचे महत्त्वाचे टप्पे पुढीलप्रमाणे आहेत.



(१) एस.एल.व्ही. -सॅटेलाईट लाँच व्हेईकल (उपग्रह प्रक्षेपक)
(२) ए.एस.एल.व्ही.-ऑगमेंटेड सॅटेलाईट लाँच व्हेईकल (अधिक क्षमतेचा उपग्रह प्रक्षेपक)
(३) पी.एस.एल.व्ही.    -पोलर सॅटेलाईट लाँच व्हेईकल (ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक)
(४) जी.एस.एल.व्ही.- जिओस्टेशनरी लाँच व्हेईकल (भूस्थिर उपग्रह प्रक्षेपक)
या सर्व प्रक्षेपकांचे वस्तुनिष्ठ आकलन महत्त्वाचे आहे. या सर्व प्रक्षेपकांमध्ये किती आणि कोणते टप्पे आहेत? या प्रक्षेपकांच्या यशस्वी चाचण्या कधी झाल्या? या प्रक्षेपकांद्वारे प्रक्षेपित केल्या जाणाऱ्या उपग्रहांच्या कक्षा कोणत्या आहेत आणि या कक्षा कशा प्रकारच्या आहेत? या सर्व बाबींचे आकलन या घटकाच्या तयारीतील महत्त्वाचा भाग आहे. या मूलभूत संकल्पनांचे आकलन करण्यासाठी विज्ञान-तंत्रज्ञान विषयातील संदर्भ पुस्तकाचा अभ्यास करावा लागतो. तसेच, इंडिया इयर बुक, भारतीय अवकाश संशोधन संस्था (करफड) या संस्थेच्या वेबसाईटवरील अद्ययावत माहितीचे संकलन करणे या घटकाच्या तयारीच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल. भारताने धुवीय उपग्रह प्रक्षेपकाच्या साहाय्याने इतर राष्ट्रांच्या उपग्रहांचेदेखील प्रक्षेपण केले असून, या सर्व बाबींचे अद्ययावत संकलनदेखील आवश्यक ठरते.
अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रातील महत्त्वपूर्ण संस्थांची आणि यंत्रणांची अचूक आणि नेमकी माहिती मिळविणे गरजेचे असून या सर्व संस्थांचे मुख्यालय, संस्थांची महत्त्वाची काय्रे आणि सद्य:स्थितीतील संस्थांशी निगडित महत्त्वाच्या घडामोडी या बाबींच्या तयारीवर भर द्यावा लागतो. कृत्रिम उपग्रहांचे उपयोजन हा अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रातील महत्त्वाचा टप्पा असून रिसोर्स सॅट, कार्टेसॅट आणि ओशनसॅट यांसारख्या दूरसंवेदी उपग्रहांच्या तंत्रज्ञानविषयक आणि उपयोजनविषयक बाबींच्या आकलनावर अधिक भर देण्याची आवश्यकता आहे. दूरसंवेदी उपग्रहांचे आपत्ती व्यवस्थापनासाठीचे उपयोजन आणि त्याचा सद्य:स्थितीतील संदर्भ अभ्यासणे फायदेशीर ठरेल.
भारताच्या खनिज संपत्तीचा विकासाच्या दृष्टीने दूरसंवेदी उपग्रहांचे उपयोजन महत्त्वाचे आहे. भारताच्या भूमी उपयोजनाच्या संदर्भातील अचूक आणि अद्ययावत माहिती मिळविण्यासाठी देखील दूरसंवेदी उपग्रहांचे उपयोजन महत्त्वपूर्ण ठरते. ‘ओशन सॅट’ हा सागरी संशोधनाच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा दूरसंवेदी उपग्रह असून मत्स्यविकासासाठी ओशन सॅटचे महत्त्व अभ्यासणे गरजेचे ठरते.
नागरी नियोजनाच्या दृष्टीने ‘कार्टेसॅट’ हा उपग्रह महत्त्वपूर्ण असून, अचूक आणि अद्ययावत नकाशे कार्टेसॅट या दूरसंवेदी उपग्रहाद्वारे उपलब्ध होतात. भारताच्या प्राकृतिक रचनेचे अचूक आणि अद्ययावत नकाशे मिळविण्यासाठी कार्टेसॅट हा महत्त्वाचा उपग्रह आहे. राष्ट्रीय दूरसंवेदी यंत्रणा ही दूरसंवेदी उपग्रहांच्या माहितीच्या उपयोजन करण्यासाठी कार्यरत असणारी यंत्रणा असून या यंत्रणेच्या कार्यपद्धतीविषयक माहिती उपयुक्त ठरेल.
‘इन्सॅट’ हा भारताच्या अवकाश कार्यक्रमातील महत्त्वाचा टप्पा असून, ‘इन्सॅट’ उपग्रहांचे उपयोजन बहुद्देशीय आहे. भारताच्या दूरचित्रवाणी आणि दूरसंचार प्रगतीमध्ये ‘इन्सॅट’ प्रणालीचे महत्त्वाचे योगदान आहे. इन्सॅट उपग्रहांच्या श्रेणींची माहितीदेखील आवश्यक ठरते. इन्सॅट प्रणालीशी निगडित असणाऱ्या मूलभूत तंत्रज्ञानविषयक संकल्पनांचे आकलन अद्ययावत संदर्भासह करण्याची आवश्यकता आहे.
‘एज्युसॅट’ हा शिक्षणविषयक उपग्रह असून दूरशिक्षणाच्या सुविधांची उपलब्धता वाढविण्यासाठी ‘एज्युसॅट’ हा उपग्रह महत्त्वपूर्ण ठरतो. टेलिमेडिसीनद्वारे दुर्गम भागांमध्ये आरोग्य सुविधा उपलब्ध करणे इन्सॅट उपग्रहांद्वारे शक्य झाले आहे. हवामानविषयक माहिती उपलब्ध करण्यासाठीदेखील इन्सॅट उपग्रह महत्त्वाचे आहेत. भारताच्या कृषी क्षेत्रासाठी हवामान अंदाज महत्त्वाचे आहेत. तसेच आपत्ती व्यवस्थापनासाठी देखील हवामान अंदाज महत्त्वाचे ठरतात. या सर्व बाबींची तंत्रज्ञानविषयक आणि उपयोजनविषयक माहितीचे संकलन उपयुक्त ठरेल.
‘स्थाननिश्चिती’साठी ग्लोबल पोझिशिनग सिस्टिम (जीपीएस)प्रणालीचे उपयोजन केले जाते. पर्वतीय प्रदेश, जंगल क्षेत्र, सागरी क्षेत्र, वाळवंटी क्षेत्र या ठिकाणी स्थाननिश्चिती जीपीएस प्रणालीद्वारे केल्यास अचूक स्थाननिश्चिती करणे शक्य होते. तसेच आपत्ती व्यवस्थापन, संरक्षण क्षेत्र, वाहतूक क्षेत्र यामध्ये जीपीएस प्रणाली महत्त्वाची असून त्यासंदर्भातील तंत्रज्ञानविषयक संकल्पनांचे आणि उपयोजनांचे आकलन आवश्यक आहे.
भौगोलिक माहिती पद्धती (जीआयएस) प्रणालींचा समावेशदेखील अवकाश तंत्रज्ञान उपघटकामध्ये करण्यात आला असून जीआयएस प्रणालीची मूलभूत माहिती आणि उपयोजन या बाबींची तयारी या घटकाच्या तयारीसाठी आवश्यक ठरते. ‘अवकाश तंत्रज्ञान विकास’ या उपघटकाची तयारी करण्यासाठी मूलभूत संकल्पनांच्या आकलनाबरोबरच अद्ययावत घडामोडींची माहिती आवश्यक ठरते.

‘एमपीएससी’चा राजमार्ग:मुख्य परीक्षा: सामान्य अध्ययन-४. ‘विज्ञान आणि तंत्रज्ञान विकास’ घटकाची तयारी-१

‘एमपीएससी’चा राजमार्ग:मुख्य परीक्षा: सामान्य अध्ययन-४. ‘विज्ञान आणि तंत्रज्ञान विकास’ घटकाची तयारी-१



कैलास भालेकर, गुरुवार, ३१ मे २०१२
प्राध्यापक, द युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.

kailasbhalekar@gmail.com
सामान्य अध्ययन-४ मध्ये ‘विज्ञान आणि तंत्रज्ञान विकास’ या घटकाचा समावेश केला आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान विकास हा घटक खूपच उपयोजित असून, या घटकाची तयारी अद्ययावत संदर्भासह करणे आवश्यक ठरते.


विज्ञान आणि तंत्रज्ञान विकास घटकांतर्गत ऊर्जा, संगणक आणि माहिती तंत्रज्ञान, अवकाश तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान, भारताचे आण्विक धोरण आणि आपत्ती व्यवस्थापन या सहा उपघटकांचा समावेश करण्यात आला आहे. या उपघटकांमध्ये समाविष्ट असणाऱ्या संकल्पनांचे वस्तुनिष्ठ आकलन आणि संकल्पनांच्या उपयोजनांसंदर्भातील अद्ययावत माहितीचे संकलन हा विज्ञान आणि तंत्रज्ञान विकास घटकाच्या तयारीतील महत्त्वाचा टप्पा आहे.
‘ऊर्जा’ ही महत्त्वाची आíथक पायाभूत संरचना असून राष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाच्या दृष्टीने ‘ऊर्जा’ या पायाभूत संरचनेचा विकास महत्त्वाचा ठरतो. पारंपरिक आणि अपारंपरिक ऊर्जास्रोत यामध्ये कोणता फरक आहे? आणि पारंपरिक ऊर्जास्रोतांची आणि अपारंपरिक ऊर्जास्रोतांची उदाहरणे यांची माहिती मिळविणे गरजेचे आहे. सद्य:स्थितीत अपारंपरिक ऊर्जास्रोत का महत्त्वाचे ठरत आहेत याची वस्तुनिष्ठ माहिती मिळविणे फायदेशीर ठरते.
पुनर्नवीकरण ऊर्जास्रोत म्हणजे काय? पुनर्नवीकरण ऊर्जास्रोतांचे महत्त्व कोणते आहे? पुनर्नवीकरण ऊर्जास्रोत सद्य:स्थितीत का महत्त्वाचे ठरत आहेत? पुनर्नवीकरण ऊर्जास्रोतांची उदाहरणे या सर्व बाबींची तयारी ‘ऊर्जा’ उपघटकाच्या तयारीतील महत्त्वाचा भाग आहे. सौरऊर्जा, पवनऊर्जा, बायोगॅस, बायोमास, भू-औष्णिक ऊर्जा या पुनर्नवीकरण ऊर्जास्रोतांची तंत्रज्ञानविषयक माहिती वस्तुनिष्ठ स्वरूपात मिळविणे गरजेचे ठरते. सौरऊर्जा भारताच्या ऊर्जा विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असून सोलर हीटर, सोलर कुकर, सोलर फोटोव्होल्टाईक सेल (सौर घट) ही उपकरणे सद्य:स्थितीमध्ये महत्त्वपूर्ण ठरली आहेत.
शाश्वत आणि पर्यावरणपूरक स्रोत म्हणून सौरऊर्जा महत्त्वाची आहे. बायोगॅस सयंत्रे ग्रामीण भागातील ऊर्जा उपलब्धतेच्या दृष्टीने महत्त्वाची असून हा एक पर्यावरणपूरक आणि शाश्वत ऊर्जास्रोत आहे. ‘बायोगॅस’ सयंत्राचे तत्त्व आणि प्रक्रिया यांची नेमकी तयारी आवश्यक ठरते.
भारतातील ऊर्जा समस्या, ऊर्जा समस्येची कारणे आणि ऊर्जा समस्या सोडविण्यासंदर्भातील महत्त्वाच्या शासकीय उपाययोजना आणि कार्यक्रम या बाबींची नेमकी माहिती ‘ऊर्जा’ उपघटकाच्या तयारीतील महत्त्वाचा भाग आहे. ऊर्जानिर्मिती संदर्भातील महत्त्वाच्या शासकीय अभियानांची माहिती मिळविणे गरजेचे असून ऊर्जानिर्मितीसाठी कार्यरत महत्त्वपूर्ण यंत्रणांची माहिती मिळविणे उपयुक्त ठरते. औष्णिक विद्युत, जलविद्युत, अणुऊर्जा या विद्युतनिर्मिती संकल्पनात्मक आकलन आवश्यक आहे. विद्युतनिर्मिती संदर्भातील समस्यांचे आकलन आवश्यक असून ही तयारी सद्य:स्थितीतील संदर्भासह करणे लाभदायक ठरेल.
वीज वितरण आणि वीज वितरणासाठी कार्यरत असणाऱ्या नॅशनल ग्रीड या यंत्रणेच्या कार्यपद्धतीचे नेमके आकलन आवश्यक असून, या सर्व बाबींची तयारी तंत्रज्ञानविषयक संकल्पनांच्या आधारे करणे उपयुक्त ठरते. वीज वितरणविषयक समस्या आणि या समस्या सोडविण्यासंदर्भातील महत्त्वाच्या उपाययोजनांची माहिती सद्य:स्थितीतील संदर्भासह करणे लाभदायक ठरेल. ‘ऊर्जा सुरक्षा’ या संकल्पनेच्या आकलनाबरोबरच भारतातील ऊर्जा सुरक्षेचे महत्त्व कोणते आहे? भारतामध्ये ऊर्जा सुरक्षासंदर्भात कार्यरत असणाऱ्या यंत्रणा आणि या यंत्रणांची कार्यपद्धती या बाबींची तयारी ‘ऊर्जा’ उपघटकाच्या तयारीतील महत्त्वाचा टप्पा आहे. ऊर्जा सुरक्षेसंदर्भातील संशोधन आणि विकासातील महत्त्वाच्या टप्प्यांचे आकलनदेखील त्यादृष्टीने महत्त्वाचे ठरते.
संगणक आणि माहिती तंत्रज्ञान या उपघटकाची तयारी करताना या घटकाशी निगडित अद्ययावत बाबींची तयारी करावी लागते. संगणक आणि माहिती तंत्रज्ञान विकास भारताच्या तंत्रज्ञान विकासातील महत्त्वाचा टप्पा असून संगणक आणि माहिती तंत्रज्ञानाचा प्रभाव विविध क्षेत्रांवर पडला आहे. संगणक आणि माहिती तंत्रज्ञानाचे उपयोजन विविध क्षेत्रांत कशा पद्धतीने होत आहे याचे अद्ययावत आकलन आवश्यक ठरते. तसेच, सायबर गुन्हे प्रकार, स्वरूप आणि सायबर गुन्हे रोखण्यासंदर्भातील उपाययोजनांची तयारीदेखील आवश्यक ठरते. सायबर गुन्हे रोखण्यासाठीच्या कायद्यांच्या महत्त्वाच्या तरतुदींची माहिती संकलित केल्यास अधिक नेमकेपणाने या उपघटकाची तयारी करणे शक्य होईल. संगणक आणि माहिती तंत्रज्ञानाच्या उपयोजनांबरोबरच संगणक आणि माहिती तंत्रज्ञानाची उपलब्धतादेखील महत्त्वाची असून शासकीय, खासगी आणि स्वयंसेवी यंत्रणांद्वारे त्यासाठी कार्यरत आहेत. त्यासंदर्भातील महत्त्वाच्या कार्यक्रमाची नेमकी माहिती मिळविणे त्यासाठी आवश्यक ठरते. ई-प्रशासन, राष्ट्रीय ई-प्रशासन योजना, ज्ञानवाहिनी, समुदाय माहिती केंद्र यांसारख्या घटकांच्या तयारीवर अधिक भर द्यावा लागतो. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात संशोधन होत असून सद्य:स्थितीत विकसित होणाऱ्या महत्त्वाच्या माहिती तंत्रज्ञानविषयक घडामोडींचे आकलन त्यादृष्टीने महत्त्वाचे ठरते. इंटरनेटचा वापर अलीकडील कालावधीत मोठय़ा प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे ई-रिटेल, ई-कॉमर्स, सोशल नेटवìकग साईट, सर्च इंजिन्स, ब्रॉड बँड, दूरसंचारविषयक महत्त्वाच्या प्रणाली या बाबींचे तंत्रज्ञानविषयक आकलन महत्त्वाचे ठरते.
संगणक आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या संदर्भातील केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या धोरणातील महत्त्वाच्या तरतुदींची तयारी केल्यास फायदेशीर ठरेल. माहिती तंत्रज्ञान उद्योग भारताच्या उद्योग क्षेत्रातील महत्त्वाचा उद्योग असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाने महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये माहिती तंत्रज्ञान उद्योगाचा महत्त्वाचा वाटा आहे.
सॉफ्टवेअर सेवांची निर्यात, व्यावसायिक प्रक्रिया हस्तांतर, ज्ञानप्रक्रिया हस्तांतर, कायदेशीर प्रक्रियेचे हस्तांतर यांसारख्या बाबींच्या तयारीवर भर देणे उपयुक्त ठरते. माहिती तंत्रज्ञान उद्योगाच्या प्रगतीचे महत्त्वाचे टप्पे, संगणकीय क्षेत्रात झालेल्या प्रगतीचे महत्त्वाचे टप्पे, भारतामध्ये संगणक आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगती या सर्व माहितीचे संकलन फायदेशीर ठरते.
विज्ञान तंत्रज्ञान विकास घटकाची तयारी अधिक नेमकेपणाने आणि वस्तुनिष्ठ स्वरूपात करणे आवश्यक असून त्यासाठी अचूक आणि अद्ययावत संदर्भ महत्त्वाचा ठरतो.

‘एमपीएससी’चा राजमार्ग:मुख्य परीक्षा:‘सामान्य अध्ययन पेपर ४’:नमुना प्रश्न

‘एमपीएससी’चा राजमार्ग:मुख्य परीक्षा:‘सामान्य अध्ययन पेपर ४’:नमुना प्रश्न



कैलास भालेकर, बुधवार, ३० मे २०१२
प्राध्यापक, द युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.
९८६०१४६२३६

kailasbhalekar@gmail.com
सामान्य अध्ययन पेपर - ४ मधील अर्थव्यवस्था आणि नियोजन, विकासाचे अर्थशात्र आणि कृषी ह्या घटकावर आधारित सरावासाठी नमुना प्रश्न या लेखात देण्यात आले आहेत.


बरोबर असणारे पर्याय ठळक अक्षरामध्ये देण्यात आलेले आहेत. परीक्षेच्या सर्वागीण तयारीसाठी संपूर्ण अभ्यासक्रम अभ्यासणे आवश्यक आहे. परीक्षाभिमुख तयारीसाठी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाकडे लक्ष देण्याची गरज आहे.
प्र. १-  खालील विधानांपकी कोणती विधाने बरोबर आहेत?
विधान    (१)आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास ह्या सारख्याच संकल्पना आहेत. विधान (२)आर्थिक वृद्धी आणि आर्थिकविकास ह्यांमध्ये फरक असून आर्थिक विकास ही संकल्पना आर्थिक वृद्धी पेक्षा अधिक व्यापक आहे. विधान (३) आर्थिकविकासासाठी आर्थिक वृद्धी अत्यावश्यक घटक आहे.
(१) फक्त विधान (१) बरोबर
(२) विधान (१), (२) बरोबर
(३) विधान (२), (३) बरोबर
(४) विधान (१), (२), (३) बरोबर.
प्र. २- मानव विकास निर्देशांकामध्ये खालीलपकी कोणत्या बाबींचा समावेश होतो?
(१) दरडोई स्थूल राष्ट्रांतर्गत उत्पादन     (२) सरासरी आयुर्मान
(३) शिक्षणाचे प्रमाण
(१) १, २
(२) २, ३
(३) १, ३  
(४) १,२, ३
प्र. ३- ‘सार्वजनिक वस्तू’ Public Goods संदर्भात खालीलपकी कोणती विधाने बरोबर आहेत?
विधान (१) सार्वजनिक वस्तूंचा वापर सर्वसमावेशक असतो.  विधान    (२) सार्वजनिक वस्तूंचा वापर असमावेशक असतो. विधान(३) सार्वजनिक वस्तूंचा वापर व्यक्तींच्या वैयक्तिक उत्पन्नाशी निगडित असतो.
(१) विधान (१) बरोबर
(२) विधान (२), (३) बरोबर
(३) विधान (३) बरोबर
(४) विधान (१), (३) बरोबर.
प्र. ४- खालीलपकी चुकीची जोडी ओळखा.
(१) आंतरराष्ट्रीय नाणेनिधी- एस. डी. आर.
(२) यू. एन. डी. पी. - मानव विकास अहवाल.
(३) जागतिक व्यापार संघटना- मानव विकास अहवाल
(४) जागतिक बँक - दीर्घकालीन कर्जे
प्र. ५- दुसरी हरितक्रांती संदर्भात खालीलपकी कोणती विधाने बरोबर आहेत?
विधान (१) दुसरी हरितक्रांतीने शाश्वत शेती विकासावर अधिक भर दिला आहे.
विधान (२) दुसरी हरितक्रांतीने भारताच्या अन्न सुरक्षिततेचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.
(१) विधान (१) बरोबर
(२) विधान (२) बरोबर
(३) दोन्ही विधाने बरोबर
(४) दोन्हीही विधाने चूक.
प्र. ६- चुकीची जोडी ओळखा.
(१) PPP - सार्वजनिक खासगी प्रारूप
(२) BOT - बांधा, वापरा, हस्तांतर करा
(३)  FDI - परकीय थेट गुंतवणूक.
(४) BOLT - पूर्णपणे सार्वजनिक गुंतवणुकीद्वारे उभारलेले प्रकल्प.
प्र. ७ - जागतिक व्यापार संघटनेसंदर्भातील खालीलपकी कोणती विधाने बरोबर आहेत?
विधान (१) भारत जागतिक व्यापार संघटनेचा संस्थापक सदस्य आहे.
विधान(२) मंत्री परिषद ही जागतिक व्यापार संघटनेची सर्वोच्च निर्णय यंत्रणा आहे. विधान (३) जागतिक व्यापार संघटनेच्या करारामध्ये सेवा-व्यापारांचा समावेश होत नाही.
(१) विधान (१) बरोबर
(२) विधान (२) बरोबर
(३) विधान (१), (२) बरोबर
(४) विधान (२), (३) बरोबर
प्र. ८- निर्गुतवणुकीकरण ही-
(१) सार्वजनिक उपक्रमांमधील शासनाचा भाग भांडवल हिस्सा वाढविण्याची प्रक्रिया आहे.
(२) खासगीकरण प्रक्रिया आहे. (३) खासगी क्षेत्रातील उद्योगांमधील भागभांडवल शासनाद्वारे खरेदी करण्याची प्रक्रिया आहे.  (४) यापकी नाही.
प्र. ९ - लघुउद्योगांच्या संदर्भात खालीलपकी कोणती विधाने बरोबर आहेत?
विधान (१) लघुउद्योग श्रमप्रधान असतात.
विधान (२) लघुउद्योग भांडवलप्रधान असतात.
विधान (३) लघुउद्योगांद्वारे उद्योगांचे विकेंद्रीकरण होण्यास चालना मिळते.
(१) विधान (१) बरोबर
(२) विधान (१), (३) बरोबर
(३) विधान (२), (३) बरोबर  
(४) विधान (३) बरोबर
प्र. १०- राष्ट्रीय महामार्ग विकास प्रकल्प खालीलपकी कोणत्या यंत्रणेद्वारे उभारण्यात येत आहे?
(१) केंद्रीय महामार्ग संस्था (२) भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण
(३) रस्ते विकास महामंडळ (४) यांपकी नाही.
प्र. ११- सहकार विकास निधी खालीलपकी कोणत्या यंत्रणेद्वारे निर्माण करण्यात आला आहे?
(१) प्रादेशिक ग्रामीण बँका (२) अग्रणी बँका
(३) नाबार्ड  (४) यांपकी नाही.
प्र. १२- शेतमालाच्या किमान आधारभूत कि मती संदर्भात शिफारस खालीलपकी कोणत्या यंत्रणेकडे केली जाते?
(१) कृषी उत्पन्न बाजार समिती (२) नाफेड
(३) नाबार्ड (४) कृषी मूल्य आणि खर्च आयोग
संपूर्ण अभ्यासक्रमाचे विश्लेषण करून परीक्षाभिमुख तयारी करण्याची आवश्यकता असून त्यासाठी सर्व संकल्पनांच्या उपयोजनाचे आकलन आवश्यक ठरते. तसेच अर्थव्यवस्थेतील सद्यस्थितीतील महत्त्वाच्या घडामोडी, शासकीय कार्यक्रम, यंत्रणा, योजना यांचा अभ्यास आवश्यक ठरेल.

‘एमपीएससी’चा राजमार्ग : मुख्य परीक्षा - ‘सामान्य अध्ययन पेपर ४’ अभ्यासाची तयारी - ५

‘एमपीएससी’चा राजमार्ग : मुख्य परीक्षा - ‘सामान्य अध्ययन पेपर ४’ अभ्यासाची तयारी - ५



कैलास भालेकर - मंगळवार, २९ मे २०१२
प्राध्यापक, द युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.

kailasbhalekar@gmail.com

‘कृषी’ भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून भारताच्या अर्थव्यवस्थेत    ‘कृषी’चे स्थान महत्त्वाचे आहे. ‘कृषी’ क्षेत्राचे रोजगारनिर्मितीविषयक महत्त्व, राष्ट्रीय उत्पन्नातील स्थान, निर्यातीतील वाटा, कृषिपूरक उद्योगांचे महत्त्व, ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्व, अन्नधान्य स्वयंपूर्णतेच्या दृष्टीने असलेले महत्त्व या सर्व घटकांच्या आधारे ‘कृषी’ क्षेत्राचे भारतीय अर्थव्यवस्थेतील महत्त्व अभ्यासता येते.



भारतीय अर्थव्यवस्थेच्या वृद्धी दरातील कृषी क्षेत्राचा प्रभाव अभ्यासणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. या सर्व बाबींचा अभ्यास योग्य आकडेवारीसह करण्याची गरज असून, त्यासाठी अचूक आणि अधिकृत संदर्भ अभ्यासता येतो.
कृषी क्षेत्रातील अल्प उत्पादकतेच्या कारणांचे नेमके आकलन करून त्यासंदर्भातील शासनाच्या विविध धोरणांची, कार्यक्रमांची माहिती मिळविणे फायद्याचे ठरते. कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या सुधारणांची अद्ययावत माहिती मिळविणेदेखील त्यादृष्टीने आवश्यक आहे. जमीन सुधारणांसंदर्भातील विविध टप्प्यांचे आकलन हा या घटकातील महत्त्वाचा भाग आहे.
भूमी उपयोजनांमध्ये अलीकडील कालावधीत महत्त्वाचे बदल होत असून, अनुकूल भूमी उपयोजनांसंदर्भातील शासकीय धोरणासंदर्भातील अचूक माहिती हा घटकाच्या तयारीतील महत्त्वाचा टप्पा आहे. भूमी संधारण आणि जलसंधारण कृषी क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी आवश्यक आहे. भूमिसंधारण आणि जलसंधारणाचे असलेले नेमके महत्त्व काय आहे आणि सध्या हे संधारण का महत्त्वाचे ठरले आहे याचे आकलन या घटकाच्या तयारीतील एक महत्त्वाचा टप्पा आहे. तसेच, भूमिसंधारण आणि जलसंधारण या संदर्भातील शासनाच्या विविध कार्यक्रमांची नेमकी माहिती आवश्यक आहे. भूमिसंधारणाच्या आणि जलसंधारणाच्या पद्धतींची आणि प्रकारांची माहिती नेमक्या स्वरूपात मिळविणे लाभदायक ठरेल. भूमिसंधारण आणि जलसंधारण या संदर्भातील स्वयंसेवी संस्थांचे कार्य आणि त्यांनी राबविलेल्या नावीन्यपूर्ण पद्धतींची माहिती मिळविणे गरजेचे आहे. या माहितीचे संकलन नेमक्या नोट्सच्या साहाय्याने केल्यास तयारीतील नेमकेपणा वाढविणे शक्य होते.
कोरडवाह शेतीचे स्वरूप आणि महत्त्व यांचे आकलन आवश्यक असून, कोरडवाह शेती विकासासंदर्भातील महत्त्वाच्या टप्प्यांची नेमकी माहिती मिळविणे उपयुक्त ठरेल. जलसिंचनाचे महत्त्व, जलसिंचनाच्या विविध पद्धती आणि विविध जलसिंचनाचे प्रमाण यांचे वस्तुनिष्ठ आकलन या घटकाच्या तयारीतील एक महत्त्वाचा टप्पा आहे. जलसिंचनासंदर्भातील राष्ट्रीय आणि राज्यस्तरावरील शासकीय कार्यक्रमांची सद्य:स्थितीतील माहिती संकलित करणे फायदेशीर ठरेल. भारताचा आर्थिक पाहणी अहवाल आणि महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवालाचा संदर्भ त्यादृष्टीने महत्त्वाचा ठरतो. तसेच कृषी अर्थशास्त्रातील घटकांच्या तयारीसाठी  कठऊकअठ एउडठडट : ऊअळळअ, रवठऊअफअट आणि कठऊकअठ एउडठडट : टकरफअ,ढवफक हे संदर्भग्रंथ उपयुक्त ठरतील. कृषी क्षेत्रातील यांत्रिकीकरणासंदर्भातील विविध टप्प्यांचे आकलन आवश्यक असून त्यासंदर्भातील अलीकडील महत्त्वपूर्ण संशोधनांची माहिती उपयुक्त ठरेल. तसेच भारतीय कृषी संशोधन परिषद, महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषद यांची भूमिका अभ्यासणे गरजेचे ठरते.
‘कृषी पतपुरवठा’ हा घटक  कृषी अर्थशास्त्राच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. कृषी पतपुरवठा रचनेचे नेमके स्वरूप अभ्यासणे आवश्यक असून त्या रचनेमध्ये समाविष्ट असणाऱ्या विविध कृषी पतपुरवठा संस्थांची माहिती हा या घटकाच्या तयारीतील एक महत्त्वाचा टप्पा आहे. या कृषी पतपुरवठा संस्थांच्या कार्यपद्धतीचे नेमके आकलनदेखील या घटकाच्या तयारीसाठी आवश्यक ठरते. नाबार्ड, भूविकास बँका यांची रचना, कार्यपद्धती आणि या संस्थांचे सद्य:स्थितीतील महत्त्वाचे कार्यक्रम यांचा अभ्यास उपयुक्त ठरतो. कृषी उत्पादनांच्या किमतीसंदर्भातील विविध महत्त्वपूर्ण घटकांची माहिती मिळविणे आवश्यक ठरते. कृषी उत्पादनांच्या किंमतपातळीवर कोणकोणत्या घटकांचा प्रभाव पडतो याचे नेमके आकलन आवश्यक असून, कृषी किमतीसंदर्भातील शासनाच्या कार्यक्रमांचे आकलन त्यादृष्टीने उपयुक्त ठरते. किमान आधारभूत किमती व किमान आधारभूत किमतीविषयक शिफारस करणाऱ्या यंत्रणा, या यंत्रणांची कार्यपद्धती, किमान आधारभूत किमती ठरविण्याची आवश्यकता या बाबींची माहिती कृषी घटकाच्या तयारीसाठी आवश्यक ठरते. त्यासंदर्भातील अनुदानविषयक तरतुदींचे आकलनदेखील आवश्यक ठरते. भारतातील कृषी विपणनाची रचना, कृषी विपणनासंदर्भातील समस्या आणि कृषी विपणन सुधारणा या घटकांचे आकलन परीक्षाभिमुख तयारीसाठी लाभदायक ठरेल. त्यासंदर्भातील कार्यरत असणाऱ्या विविध यंत्रणांच्या वस्तुनिष्ठ माहितीचे आकलन उपयुक्त ठरते.
‘अन्न आणि पोषण’ हा भारताच्या संदर्भातील महत्त्वाचा घटक असून, भारताच्या अन्न उत्पादनासंदर्भातील आणि वापरासंदर्भातील विविध महत्त्वाच्या प्रवाहांचा वेध घेणे त्यासाठी आवश्यक ठरते. पहिली हरितक्रांती आणि सद्य:स्थितीतील दुसरी हरितक्रांती यांमधील महत्त्वाच्या टप्प्यांचा अभ्यास या घटकाच्या तयारीतील आवश्यक आहे. भारताची अन्नस्वयंपूर्णता आणि अन्नसुरक्षा यांचे संकल्पनात्मक आकलन आणि त्यासंदर्भातील शासनाच्या महत्त्वाच्या कार्यक्रमांची अचूक माहिती उपयुक्त ठरते. प्रस्तावित अन्नसुरक्षा कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदींची माहिती मिळविणेदेखील या घटकाच्या तयारीच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल. भारताच्या अन्नधान्याची साठवणूकविषयक आणि अधिप्राप्तीविषयक समस्यांचे अचूक आकलनदेखील या घटकाच्या तयारीसाठी आवश्यक ठरेल. समतोल आहार आणि अन्नघटकांची पोषकमूल्ये यांची नेमकी माहिती मिळविणे गरजेचे असून, भारतातील पोषणविषयक समस्या आणि त्यांचे परिणाम यांचे आकलन हा या घटकाच्या तयारीतील महत्त्वपूर्ण भाग ठरतो. तसेच त्यासंदर्भातील शासनाच्या सार्वजनिक वितरण व्यवस्था, कामासाठी धान्य, मध्यान्ह भोजन कार्यक्रम यासारख्या उपाययोजनांची अचूक माहिती अद्ययावत संदर्भासह संकलित करणे त्यादृष्टीने महत्त्वाचे ठरते.
‘कृषी अर्थशास्त्र’ घटकाची परिपूर्ण तयारी होण्यासाठी संदर्भग्रंथांबरोबरच सद्य:स्थितीतील उपयोजित संदर्भाचे आकलन करणे लाभदायक ठरेल.

‘एमपीएससी’चा राजमार्ग : मुख्य परीक्षा - ‘सामान्य अध्ययन पेपर ४’ : अभ्यासाची तयारी - ४

‘एमपीएससी’चा राजमार्ग : मुख्य परीक्षा - ‘सामान्य अध्ययन पेपर ४’ : अभ्यासाची तयारी - ४



वृद्धी, विकास आणि आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र
कैलास भालेकर - सोमवार, २८ मे २०१२
प्राध्यापक, द युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.

kailasbhalekar@gmail.com

विकासाचे अर्थशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र यांचा समावेश या  घटकांतर्गत करण्यात आलेला आहे. विकासाच्या अर्थशास्त्रामधील महत्त्वपूर्ण संकल्पनांचे आकलन आवश्यक ठरते. कारण हा घटक खऱ्या अर्थाने नावीन्यपूर्ण संकल्पनांवर आधारित आहे. आíथक वृद्धी आणि आíथक विकास या संकल्पना नेमक्या काय आहेत? या संकल्पनांमध्ये कोणता फरक आहे? आíथक वृद्धी आणि आíथक विकास यांचे मोजमाप का आवश्यक आहे? आíथक वृद्धी आणि आíथक विकास यांमध्ये कोणता सहसंबंध आहे? यांसारख्या बाबींची तयारी अधिक नेमकेपणाने करण्याची आवश्यकता आहे.
विकासाचे निर्देशांक म्हणजे काय? आणि विकासाच्या निर्देशांकामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो? यांसारख्या बाबींचा अभ्यास करणे या घटकाच्या तयारीसाठी आवश्यक ठरते. विकास आणि पर्यावरण यांचा समतोल निर्माण करण्याची गरज असून, नसíगक साधनसंपत्तीचे संधारण त्यामधील एक महत्त्वाचा घटक ठरतो. भविष्यातील पिढय़ांच्या संसाधनांच्या गरजांचा विचार करून संसाधनांचा वापर करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी ‘शाश्वत विकास’ महत्त्वाचा असून शाश्वत विकासाचा समावेश या घटकांमध्ये करण्यात आला आहे. शाश्वत विकास ही संकल्पना नेमकी काय आहे? शाश्वत विकासामध्ये कोणकोणत्या बाबी येतात? शाश्वत विकासासाठी शासकीय स्तरावरून केलेल्या प्रयत्नांची आणि उपाययोजनांची माहिती या विषयाच्या तयारीतील महत्त्वाचा भाग ठरतो. तसेच, शाश्वत विकासाशी निगडित विविध आयामांचे आकलनदेखील त्यासाठी आवश्यक ठरते. शाश्वत विकासामधील शाश्वत शेती या संकल्पनेची तयारी आवश्यक असून त्यासंदर्भात शासनाने केलेल्या कार्यक्रमांची आणि धोरणांची माहिती महत्त्वाची ठरते. पर्यावरणविषयक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्था आणि स्वयंसेवी संस्था यांद्वारे केलेल्या कार्याची आणि प्रयत्नांची माहिती संकलित केल्यास लाभदायक ठरेल. अर्थातच, या अभ्यासक्रमाची तयारी करताना परीक्षाभिमुख आणि बहुपर्यायी स्वरूपाकडे लक्ष देणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. हरित स्थूल राष्ट्रांतर्गत उत्पादन (ग्रीन जीडीपी) यांसारख्या संकल्पनेचादेखील समावेश या घटकामध्ये करण्यात आलेला आहे. ग्रीन जीडीपीसारख्या संकल्पनांचे आकलन सद्य:स्थितीच्या संदर्भासह करणे महत्त्वाचे आहे.
आíथक विकासाचे घटक उदा., नसíगक साधनसंपत्ती, लोकसंख्या, मानवी संपत्ती, पायाभूत संरचना यांसारख्या घटकांची तयारी गरजेची असून, या घटकांचे आíथक विकासाच्या दृष्टीने महत्त्व कोणते आहे याचे आकलनदेखील महत्त्वाचे आहे. आíथक विकासाच्या या घटकांचा सहसंबंध समजून घेऊन सद्य:स्थितीतील संदर्भासह केलेला अभ्यास उपयुक्त ठरेल. आíथक विकासाच्या घटकांशी निगडित असणाऱ्या विविध समस्या आणि या समस्या सोडविण्यासाठी आवश्यक उपाययोजना यांची तयारीदेखील महत्त्वाची आहे.
लोकसंख्या संक्रमण सिद्धान्त समजून घेऊन त्यातील सर्व टप्प्यांचे अचूक आकलन या घटकाच्या तयारीतील एक महत्त्वाचा भाग आहे. अर्थातच, लोकसंख्या संक्रमण सिद्धान्ताचे आकलन भारताच्या संदर्भासह करणे महत्त्वाचे ठरते. लोकसंख्या संक्रमण सिद्धान्तातील टप्प्यांचा भारतावरील नेमका प्रभाव अभ्यासणेदेखील आवश्यक आहे. या सर्व बाबींच्या तयारीसाठी ‘विकासाचे अर्थशास्त्र’ या विषयावरील अर्थशास्त्राच्या संदर्भग्रंथांचा संदर्भ घेता येईल.
मानव विकास निर्देशांक, मानव दारिद्रय़ निर्देशांक, या निर्देशांकामध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो? समाविष्ट बाबींना असणारा भारांक यांची तयारी महत्त्वाची ठरते. तसेच निर्देशांक जाहीर करणारी आंतरराष्ट्रीय संस्था, आंतरराष्ट्रीय संस्थांचे अहवाल, मानव विकास निर्देशांकामध्ये भारताचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रमांक, भारतामध्ये मानव विकास निर्देशांकामध्ये महाराष्ट्राचा क्रमांक यासारखी आकडेवारी संकलित करणे महत्त्वाचे ठरते. यू.एन.डी.पी. या संस्थेची वेबसाईट, भारताचा आíथक पाहणी अहवाल, महाराष्ट्राचा आíथक पाहणी अहवाल यांचा संदर्भ उपयुक्त ठरतो. तसेच संकल्पनांच्या आकलनासाठी ‘विकासाचे अर्थशास्त्र’ विषयावरील संदर्भ पुस्तकांचा अभ्यास आवश्यक आहे. स्त्री-सक्षमीकरणासंदर्भातील शासकीय उपाययोजनांच्या माहितीचे संकलनदेखील त्यादृष्टीने आवश्यक ठरते.
आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेतील काही बाबींचा समावेश या घटकांतर्गत करण्यात आलेला आहे. परकीय भांडवल, परकीय भांडवलाची आíथक वृद्धीतील भूमिका यांचा अभ्यास आवश्यक ठरतो. परकीय भांडवलाशी निगडित थेट परकीय गुंतवणूक (FDI), परकीय वित्तीय गुंतवणूक (FPI), परकीय व्यापारी कर्जे (ECB) यांसारख्या संकल्पनांचे आकलन महत्त्वाचे असून या संकल्पनांचा सद्य:स्थितीशी निगडित संदर्भासह अभ्यास या घटकाच्या तयारीसाठी उपयुक्त ठरेल.
आंतरराष्ट्रीय व्यापार, आंतरराष्ट्रीय व्यापाराचे आíथक वृद्धीसाठी असलेले महत्त्व अभ्यासणे आवश्यक ठरते. आंतरराष्ट्रीय व्यापाराशी निगडित महत्त्वपूर्ण उपयोजित संकल्पनांच्या आकलनाबरोबरच आंतरराष्ट्रीय व्यापार धोरणाचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. आंतरराष्ट्रीय व्यापाराशी निगडित सद्य:स्थितीतील महत्त्वाच्या आकडेवारीचे परीक्षाभिमुख संकलन उपयुक्त ठरेल. आंतरराष्ट्रीय व्यापाराचे महत्त्वाचे सिद्धान्त अभ्यासणे आवश्यक असून, या सिद्धान्ताच्या परीक्षेच्या दृष्टीने वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपानुसार नोट्स तयार करणे उपयुक्त ठरेल. विशेषत: रिव्हिजनसाठी या नोट्स लाभदायक ठरतील.
जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक व्यापार संघटना, सार्क, आसियान यांसारख्या आंतरराष्ट्रीय संघटनांची रचना, काय्रे आणि सद्य:स्थितीतील महत्त्वपूर्ण संदर्भ यांची तयारी या दृष्टीने महत्त्वाची आहे. आंतरराष्ट्रीय संस्थांची तयारी करताना भारताच्या संदर्भासह करणे अधिक उपयुक्त ठरेल.
वृद्धी, विकास आणि आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र या घटकाची तयारी करताना संकल्पना, संकल्पनांचे उपयोजन आणि सद्य:स्थितीतील संदर्भावर अधिक भर देणे उपयुक्त ठरते.