Monday, September 3, 2012

‘एमपीएससी’चा राजमार्ग - मुख्य परीक्षा : मुख्य परीक्षेचे नवे स्वरूप

‘एमपीएससी’चा राजमार्ग - मुख्य परीक्षा : मुख्य परीक्षेचे नवे स्वरूप


तुकाराम जाधव - सोमवार, २६ मार्च २०१२
संचालक, द युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.

malharpatil@gmail.com
altविद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो, मागील आठवडय़ात राज्यसेवा पूर्वपरीक्षा तयारीसंबंधी लेखमालेची आपण सांगता केली आणि आजपासून राज्यसेवा मुख्य परीक्षेविषयी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. वस्तुत: आपल्या लेखमालेतील सुरुवातीच्या लेखात राज्य लोकसेवा आयोगाने मुख्य परीक्षा व मुलाखतीसंबंधी यावर्षीपासून स्वीकारलेल्या बदलाची नोंद घेतली होती.
आयोगाने स्वीकारलेल्या या बदलास सर्वागीणपणे लक्षात घेतल्याशिवाय नव्या परीक्षेला यशस्वीरीत्या सामोरे जाणे शक्य नाही. म्हणूनच पुढील लेखांत राज्यसेवेची नवी मुख्य परीक्षा, त्यातील बदल, नवा अभ्यासक्रम, नव्याने वाचावयाचे संदर्भसाहित्य, नवी परीक्षापद्धती आणि अभ्यासपद्धती अशा सर्व महत्त्वपूर्ण घटकांविषयी चर्चा करणार आहोत. मुख्य परीक्षेनंतर येणाऱ्या मुलाखतीविषयीदेखील सविस्तरपणे माहिती सादर केली जाणार आहे. यात मुलाखतीच्या संकल्पनेपासून ते तयारीच्या रणनीतीपर्यंत सर्व बाजूंची सांगोपांग चर्चा केली जाणार आहे.
उपरोक्त परिच्छेदात नमूद केल्याप्रमाणे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २०१२ पासून राज्यसेवा मुख्य परीक्षा आणि मुलाखत (व्यक्तिमत्त्व चाचणी) या दोन्ही टप्प्यांत अभ्यासक्रम, परीक्षेचे स्वरूप आणि गुणपद्धती या तिन्ही संदर्भात महत्त्वपूर्ण बदल स्वीकारले आहेत. त्यानुसार राज्यसेवेची येणारी मुख्य परीक्षा (१ ते ३ सप्टेंबर २०१२) नव्या पद्धतीआधारेच आयोजित केली जाईल. मुख्य परीक्षेतील बदलाचा विचार केल्यास पुढील बाबी लक्षात घेता येतील.
ल्ल राज्यसेवा मुख्य परीक्षेत आता मराठी, इंग्रजी हे भाषेचे दोन पेपर्स आणि सामान्य अध्ययनाचे ’  इतिहास-भगोल; ’ राज्यघटना, शासन व राजकारण;  ’ मानव संसाधन विकास व मानवी हक्क; आणि ’ अर्थव्यवस्था, विज्ञान-तंत्रज्ञान असे चार पेपर्स अंतर्भूत केले आहेत.
* उपरोक्त विषयांपैकी केवळ भाषेचे दोन पेपर्स हे वर्णनात्मक, लेखी स्वरूपाचे असतील.
ल्ल  म्हणजे सामान्य अध्ययनाचे चारही पेपर्स वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असतील. थोडक्यात हे पेपर्स बहुपर्यायी प्रश्नांवर आधारित वस्तुनिष्ठ स्वरूपाचे करण्यात आले आहेत.
*  मराठी १०० गुण, इंग्रजी १०० गुण आणि सामान्य अध्ययनाच्या प्रत्येक पेपरसाठी १५० गुण अशी विषयावर गुणविभागणी स्वीकारली आहे. म्हणजे नवी राज्यसेवा मुख्य परीक्षा एकूण ८०० गुणांची असणार आहे.
*  राज्यसेवा मुख्य परीक्षेलाही नकारात्मक गुणपद्धती लागू केली आहे. त्यानुसार प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी त्या प्रश्नासाठी निर्धारित केलेल्या गुणांपैकी १/३ गुण प्राप्त गुणसंख्येतून वजा केले जाणार आहेत.
*  एवढेच नव्हे तर मुख्य परीक्षेत समाविष्ट प्रत्येक विषयात आयोगाने निर्धारित केलेली ‘पात्रता गुणसंख्या’ मिळवणे अनिवार्य झाले आहे. यानुसार खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांला प्रत्येक विषयात ४५% आणि सर्व आरक्षित प्रवर्गातील उमेदवाराला ४०% गुण प्राप्त करावे लागतील. म्हणजेच अंतिमत: मुख्य परीक्षेत पात्र होण्यासाठी प्रत्येक विषयातही किमान गुणांची कमाई करावी लागणार आहे. मगच सर्व विषयांत प्राप्त झालेल्या गुणांची बेरीज करून निकाल घोषित केला जाईल.
अशा रितीने अभ्यासक्रम, परीक्षेचे स्वरूप आणि गुणपद्धती या संदर्भात जणू क्रांतिकारी स्वरूपाचेच बदल स्वीकारण्यात आले आहेत. त्यामुळे या नव्या परीक्षेचा विचार करताना अभ्यासक्रमापासूनच सुरुवात करावी लागणार आहे. त्यादृष्टीने विचार करता मराठी, इंग्रजी आणि सामान्य अध्ययनाचे चारही पेपर्स या सर्व विषयांचा नवा अभ्यासक्रम बारकाईने पाहणे अत्यावश्यक आहे. विशेषत: सामान्य अध्ययनाच्या अभ्यासक्रमात स्वीकारलेले बदल हे अधिक आव्हानात्मक आहेत. म्हणूनच येणाऱ्या काही लेखांत प्रत्येक विषयाचा विचार करताना अभ्यासक्रमाची व्याप्ती लक्षात घेऊनच पुढे जाणार आहोत. अभ्यासक्रमाचे सखोल अवलोकन केल्यानंतर ‘त्या त्या विषयासाठी नेमकी कोणती संदर्भ पुस्तके वाचायाची?’ हा गहन प्रश्न निर्माण झाला आहे; त्याची पुढील लेखात सखोल चर्चा केली जाईल. महत्त्वाचे म्हणजे परीक्षेचे वस्तुनिष्ठ स्वरूप, नकारात्मक गुणपद्धती आणि प्रत्येक विषयात किमान पात्रता गुणप्राप्ती करण्याची अनिवार्यता या बाबी पाहता कोणत्या पद्धतीने अभ्यास करायचा? हा आव्हानात्मक प्रश्नही चर्चिला जाणार आहे. तेव्हा विद्यार्थीहो, या नव्या बदलांना यशस्वीरीत्या सामोरे जाण्यासाठी सिद्ध व्हा!
राज्यसेवा मुख्य परीक्षा (नवा आराखडा)
अ.क्र.     विषय व पेपर                                               गुण      एकूण गुण
१.     अनिवार्य मराठी                                                     १००   
२.     अनिवार्य इंग्रजी                                                     १००
३.     सामान्य अध्ययन पेपर १ - इतिहास व भूगोल                     १५०
४.    सामान्य अध्ययन पेपर २ - भारतीय राज्यघटना व राजकारण     १५०
५.    सामान्य अध्ययन पेपर ३ - मानव संसाधन विकास व मानवी हक्क १५०
६.    सामान्य अध्ययन पेपर ४ - अर्थव्यवस्था व विज्ञान तंत्रज्ञान        १५०     ८००

No comments: