तुकाराम जाधव ,शनिवार, २४ मार्च २०१२
संचालक, द युनिक अॅकॅडमी, पुणे.
malharpatil@gmail.

दुसऱ्या बाजूला आपल्या अभ्यासात परीक्षाभिमुखता येण्यासाठी प्रश्नांचा भरपूर सराव करणे अत्यावश्यक असते. मागील लेखांत म्हटल्याप्रमाणे सराव चाचण्यांद्वारे आपल्या अभ्यासाची व्याप्ती व सखोलता तपासता येते. त्याद्वारे आपल्या उणिवा लक्षात घेऊन त्यावर मात करणे शक्य बनते. म्हणूनच सरावचाचण्यांचा नियमितपणे केलेला अवलंब आपल्या तयारीत परीक्षाभिमुखतेची हमी देण्यासाठी अत्यावश्यक ठरतो. थोडक्यात स्वरूप, अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिका, संदर्भसाहित्य आणि नियोजन या प्रत्येक घटकाचा काटेकोर आणि परीक्षापद्धतीला समोर ठेवून विचार करणे महत्त्वाचे ठरते.
एकंदर या परीक्षेसंबंधी जाणून घेतल्यानंतर ही बाब लक्षात येते, की प्रत्येक विद्यार्थ्यांला या परीक्षेच्या तयारीसाठी आपल्या व्यक्तिमत्त्वातही पूरक बदल करावे लागतात. प्रस्तुत स्पर्धापरीक्षेची तयारी करण्याचा विचारपूर्वक निर्णय घेतल्यानंतर परीक्षेच्या तयारीसाठी किती कालावधी आवश्यक आहे? प्रत्यक्षात किती कालावधी उपलब्ध आहे? आपल्या व्यक्तिमत्त्वात काही उणिवा आहेत का? आपले स्ट्राँग पॉइंट्स कोणते आहेत? अशा विविध अंगांनी स्वयंमूल्यमापन करणे उपयुक्त ठरते. निर्धारित एक-दोन वर्षांच्या काळात मुख्यत: या परीक्षेला सामोरे ठेवूनच आपले वेळापत्रक विकसित करावे. कारण जाता जाता किंवा केवळ टाइम पास करत करत या परीक्षेचा अभ्यास करता येत नाही अथवा यात यशही प्राप्त करता येत नाही, हे कायम स्मरणात ठेवा. म्हणूनच राज्यसेवेचे ध्येय निर्धारित केल्यानंतर इतर वेगळय़ा बाबीत वेळ व्यतीत न करता आपल्या ‘लक्ष्या’वर नजर ठेवावी. तेव्हा, विद्यार्थी मित्रहो, येणाऱ्या काळात या चर्चेला स्मरणात ठेवून तुम्ही आपल्या तयारीला सुरुवात कराल अशी खात्री वाटते.
अर्थात, येत्या सोमवारपासून म्हणजे २६ मार्चपासून राज्यसेवा मुख्य परीक्षा आणि मुलाखत या उर्वरित दोन टप्प्यांविषयी जाणून घेणारी लेखमाला सुरू करत आहोत. त्यामुळे राज्यसेवा परीक्षेतील पूर्वपरीक्षेचा टप्पा पार करून मुख्य व मुलाखतीला कसे सामोरे जायचे किंबहुना त्यात नेत्रदीपक यश प्राप्त करून अपेक्षित पदापर्यंतचा प्रवास कसा सुखकर करायचा याची सविस्तर व सखोल माहिती सादर केली जाणार आहे.. तर मग पुढील तयारीला सज्ज व्हा!
No comments:
Post a Comment